शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नासाका गिळंकृत करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:14 IST

नाशिक सहकारी साखर कारखान्यावर अवसायक नेमून तो गिळंकृत करण्याचा सहकार मंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप शनिवारी (दि.२८) झालेल्या विशेष सभेत सभासदांनी केला. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नासाकाच्या प्रश्नावरून त्यांना घेराव घालण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला.

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखान्यावर अवसायक नेमून तो गिळंकृत करण्याचा सहकार मंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप शनिवारी (दि.२८) झालेल्या विशेष सभेत सभासदांनी केला. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नासाकाच्या प्रश्नावरून त्यांना घेराव घालण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला.नासाकाची विशेष सर्वसाधारण सभा कार्यस्थळावरील हॉलमध्ये प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कारखान्याने २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरू करण्याची सर्व तयारी सुरू असताना व सहकार मंत्र्यांनी नेमलेले प्राधिकृत मंडळ कार्यरत आहे तरीदेखील अचानक प्राधिकृत मंडळ रद्द करून अवसायक नेमण्याची कार्यवाही सुरू करणे, जिल्हा बॅँकेने कारखाना विक्री व २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत निविदा प्रसिद्ध केल्याने सभेत सभासदांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.  यावेळी माजी संचालक पी. बी. गायधनी यांनी कारखाना व शेतकºयांबाबत शासनाचा दृष्टिकोन चांगला नसून सहकार क्षेत्र संपवून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. कारखान्यावर भाजपाप्रणीत प्राधिकृत मंडळ असताना कारखान्याची मालमत्ता गिळंकृत करण्याच्या दृष्टिकोनातून हे मंडळ बरखास्त करून त्यांच्यासह सभासदांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप गायधनी यांनी केला. राज्यात कुठेही २५ वर्षांच्या मुदतीसाठी कारखाना भाडेतत्त्वाने दिलेला नाही. मात्र नासाकाबाबत जिल्हा बॅँकेला हाताशी धरून सहकार मंत्र्यांनी ही खेळी केली असल्याचाही आरोप करण्यात आला.  यावेळी काशीनाथ जगळे, हभप रामनाथ महाराज शीलापूरकर, अशोक खालकर, माधव गंधास, संतू पाटील हुळहुळे, संजय धात्रक, श्रीकांत गायधनी, अ‍ॅड. सुभाष हारक, चिंतामण विंचू आदींनी नासाकाबाबत शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांनी प्राधिकृत मंडळ नियुक्ती ते अवसायक नियुक्तीपर्यंतचा आढावा सांगून सहकारमंत्र्यांच्या भूमिकेची माहिती दिली.जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी संचालकांची भूमिकासुद्धा संशयास्पद असून, आतापर्यंत कारखान्याने बॅँकेला १२५ कोटी रुपये व्याजापोटी भरल्याचे गायधनी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या सोमवारी होणाºया जनता दरबारात नासाका प्रश्नावरून घेराव घालण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.