शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

देवस्थानासह प्रदक्षिणा बंद असतानाही भाविकांचा ओघ सुरुच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST

तालुक्यात पर्यटन वाढल्याने गोरगरीब भाविकांना तसेच गाईड व छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना पोटापाण्यापुरता रोजगार मिळत आहे. पण शासनाने संचारबंदी लागू ...

तालुक्यात पर्यटन वाढल्याने गोरगरीब भाविकांना तसेच गाईड व छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना पोटापाण्यापुरता रोजगार मिळत आहे. पण शासनाने संचारबंदी लागू केल्याने गावात जाणारी वाहने बॅरिकेडिंग लावून बाहेरच्या बाहेर थोपविण्यात आली आहेत. जव्हारफाटा परिसरात सर्व खासगी वाहने उभी करण्यात येत असल्याने तेथून हातात बॅग व मोठ्या पिशव्या घेऊन भाविक, पर्यटक यांची ससेहोलपट सुरू आहे. श्रावण सोमवारच्या प्रदक्षिणेवर बंदी असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्र्यंबकेश्वरला कसे येत आहेत ? विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरला भाविक पर्यटक येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन बॅरिकेडिंग लावून तसेच पोलीस फोर्स लावून उपाययोजना करावी लागत आहे. दर्शनीय तथा प्रेक्षणीयस्थळांकडे जाण्यासाठी पोलीस मनाई करत आहेत. हिच गर्दी पोलीस नाशिकला का अडवत नाही, असा सवाल त्र्यंबकेश्वरचे व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.

शासनाने स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकाऱ्यांना दिले असताना ते निर्णय घेण्याची जबाबदारी घेत नाहीत. कारण त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तालुका कोरोनामुक्त आहे; परंतु नवीन रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच डेंग्यू व चिकुनगुन्या आदी साथींचे आजार उद्भवले असताना आम्हाला स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेऊ शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, शनिवार, रविवार व सोमवारी पतेती (पारशी नववर्ष) हे सलग तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने त्र्यंबकेश्वरला नेहमीपेक्षा भाविक, पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.

इन्फो...

त्र्यंबकचा कायापालट होणार

सध्या जोरदार पाऊस नसला तरी सारखी रिपरिप सुरू आहे. साहजिकच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणाऱ्या, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या निसर्गप्रेमींना सध्याचे वातावरण आकर्षित करण्यायोग्य आहे. यासाठी त्यांचा कल त्र्यंबककडे वाढणे साहजिकच आहे. तसेच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात, पर्यटनस्थळांत वाढ होणे गरजेचे आहे. जेणेकरून रोजगाराच्या संधी वाढल्या पाहिजेत, यासाठी पर्यटनास वाव द्या. रोजगाराच्या संधी उपलब्ध करा. यासाठी केंद्र सरकारने प्रसाद योजना त्र्यंबकेश्वरसाठी गत दोन वर्षांपासून मंजूर केली आहे. लवकरच या योजनेमुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार आहे. सध्या या योजनांची कामे त्र्यंबकेश्वर व अंजनेरी येथे सुरू आहेत.