शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कळवण शहरातील विकासकामेही कोरोनाच्या संकटामुळे ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:36 IST

कळवण : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्याचा परिणाम सार्याच घटकांवर झाला आहे. त्यातून कळवण शहरातील विकासकामांचीही सुटका झालेली नाही. 22 कामे कोरोनामुळे लागलेल्या संचरबंदीमुळे ठप्प झाली आहेत.

कळवण : (मनोज देवरे) कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्याचा परिणाम सार्याच घटकांवर झाला आहे. त्यातून कळवण शहरातील विकासकामांचीही सुटका झालेली नाही. 22 कामे कोरोनामुळे लागलेल्या संचरबंदीमुळे ठप्प झाली आहेत. मार्चअखेर नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून करावयाची विकासकामे ’डाऊन’ झाली होती, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे सहा कामे सुरु झाली आहेत. तर शहरातील 16 कामे बंद असलेल्या कामांना लवकरच मुहूर्त लागणार आहे.नगरपंचायत अंतर्गत होणारी कर वसुली ठप्प झाली आहे. 65 लाखांहून अधिक थकबाकी असून नगरपंचायतवर दरवर्षी 22 लाखांहून अधिक रकमेचा भुर्दंड असमावेशीत कर्मचारी यांच्या पगारामुळे पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दोन कोटींहून अधिक निधीच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. कळवण ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर सुरु वातीच्या काळात अनेक अडचणींना नगराध्यक्षासह गटनेते, नगरसेवक यांना तोंड द्यावे लागले. आमदार नितीन पवार यांच्या अधिपत्याखाली शासनाकडून नगरपंचायतीला विशेष निधी मिळाला आहे मात्र, तो कोरोनामुळे लालिफतीत अडकला आहे.-----------------------दररोजचे चलन थांबलेपगाराचा भुर्दंडलॉकडाऊनमुळे नगरपंचायतची करवसुली रखडली आहे.त्यामुळे सर्वच कर्मचार्यांचा पगार वेळेत करण्याचा यक्षप्रश्न प्रशासनासमोर असणार आहे. नगरपंचाय्ंतीचे उत्पन्न स्त्रोत कमी असल्यामुळे कारभार हा शासनाच्या अनुदानावरच अवलंबून राहिला आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी व विकास करावरच विकासकामे अवलंबून आहेत. उत्पन्न घटल्याने अंदाजपत्रकाचा चढता आलेख आता खालावत चालला आहे. त्यामुळे निधीची चणचण नगरपंचायत समोर निर्माण झाली आहे. मिळकत करातून उत्पन्न मिळते. मात्र कोरोनामुळे कर वसुलीचे प्रमाण किती असणार याबाबत ठामपणे सांगता येणार नाही. व्यवहार बंद आहेत, रोजगार नाही, दररोजचे चलनच थांबले आहे. अशा स्थितीत कर वसुलीचा तगादा लावला तर सर्वसामान्यांतून उद्रेक होण्याचीच शक्यता जास्त आहे.----------------------४कळवण नगरपंचायतची बिकट आर्थिक स्थिती आणि अंदाजपत्रकानुसार होत नसलेली उद्दीष्टपूर्ती त्यामुळे नगरपंचायतच्या उत्पन्नाचा आलेख घसरत आहे.४कोरोनामुळे निर्माण होणार्या स्थितीमुळे नियोजित सर्व विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यताआहे. ग्रामपंचायतीत सेवेत असलेल्या 10 कर्मचार्यांचे समावेशन झाले आहे.४35 कर्मचाऱ्यांचे समावेशन नसल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भुर्दंड दरवर्षी बसत आहे. त्यामुळे नगरपंचायतीत त्यांचे समावेशन करणे गरजेचे आहे.----------------------१नगरपंचायतीला शासनाचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तोदेखील कोरोनामुळे अद्याप प्राप्त झालेला नाही. दलित वस्ती, दलितेतर विकास निधी, नगरोत्थान, रस्ता निधी या वेगवेगळ्या शिर्षकातून नगरपंचायतला आजपर्यंत 20 कोटीहून अधिक निधी मिळाला आहे. त्यातून शहर अंतर्गत सिमेंट काँक्र ीटचे रस्ते विकासकामांची साक्ष देत आहेत. शहरातील सर्वच भागात धुमधडाक्यात रस्त्याचे रु ंदीकरण, सुशोभीकरण, काँक्रि टीकरण, डांबरीकरण झाल्यामुळे परिसराचा ’लूक’ बदलला.२एकीकडे शहराचा विकास दिसत असला तरी शिवाजीनगर भागातील रस्त्याचे भाग्य मात्र अजून उजळले नाही. रस्त्याच्या रु ंदीकरणसह काँक्र ीटीकरण व गटारीचे काम मंजूर असल्याची वंदता आहे. गटनेते कौतिक पगार, नगराध्यक्षा रोहिणी महाले, उपनगराध्यक्ष अतुल पगार, मुख्याधिकारी सचिन माने यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या एकीचे हे बळ दिसते.३मात्र मुहूर्त लागत नाही व निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोरोनाच्या गर्तेत सापडलेल्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त शोधावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.कोरोनाचे संकट कोसळल्यामुळे मजूर वर्ग गावाकडे निघून गेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रु पयांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये गटारी आणि रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. काही ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. बहुतांशी कामांचे इस्टिमेट व टेंडर प्रक्रि याही झाली तर काही थांबली आहेत.------------------शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली व विषय समित्यांचे वाटपही झाले. यामुळे जादा निधी उपलब्ध होईल, विकासाची कामे वेगाने होतील अशी अपेक्षा होती, पण सुरु वातीला तीन वर्षे विकासकामांसाठी निधीच मिळाला नाही. परिणामी विकास कामे ठप्प झाली. नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींना शहर विकासासाठी शासनाकडून विशेष विकास निधी दिला जातो. परंतु कळवण नगरपंचायतीला निधीवाटप करताना सापत्न वागणूक देण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे 16 कामे बंद असून 6 कामे सुरु आहेत.- कौतिक पगार, गटनेते, नगरपंचायतकोरोनाचा संसर्ग मार्च मिहन्यात वाढू लागल्याने केंद्र व राज्य सरकारने विविध उपाय योजना सुरू केल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपंचायतवर आली. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पोलीस, आरोग्य विभागाच्या बरोबरीने नगरपंचायत प्रशासन खांदयाला खांदा लावून काम करू लागले ; मात्र याचा परिणाम नगरपंचायतच्या कारभारावर झाला. मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेर. या महिन्यात नगरपंचायतची सरासरी 70 टक्के कर वसूल होतो. मात्र मार्च 2020 मध्ये नगरपंचायतची सर्व यंत्रणा कर वसुली ऐवजी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनात गुंतली. यामुळे कर वसुली झाली नाही.- सचिन माने, मुख्याधिकारी, नगरपंचायत

टॅग्स :Nashikनाशिक