शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

एक विचाराच्या समाजामुळे विकास

By admin | Updated: November 28, 2015 23:59 IST

एकनाथ खडसे : लेवा समाज मेळावा उत्साहात

नाशिक : समाजसेवेच्या माध्यमातून समाज एकत्र करण्याचे जाळे विणले जाते. एका विचाराने समाजात काम केल्यास त्या त्या समाजाची विकास व उन्नती होते, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे.लेवा समाज कल्याण मंडळाच्या वतीने एकनाथ खडसे यांचा सत्कार व समाजातील उपवर वधू-वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार राजूमामा भोळे, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, संभाजी मोरुस्कर, सतीश सोनवणे, सतीश कुलकर्णी, लेवा समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष संजय वायकुळे, अरविंद अत्तरदे, अशोक भिरुडे, डॉ. नामदेव पाटील, हेमंत पाटील, अरुण पाटील, लिना पाटील, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. राजेंद्र नेहते, अनिल महाजन, रवींद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लेवा समाज कल्याण मंडळाने तयार केलेली वधू-वर सूचीचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, आपण जगात कुठेही गेलो, तरी प्रत्येक समाज आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत असतो. आज लेवा समाज ठराविक जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरला आहे. त्यामुळेच आपण हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही समाजाच्या कार्यक्रमास उपस्थित आहोत. समाजासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, तसेच समाजानेही एका हाकेसरशी समाजातील अडचणीत सर्वांनाच मदत केली पाहिजे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले, हा समाज देशभर नव्हे तर जगभर पसरला आहे. वधू-वर मेळाव्यात नेहमीच सरकारी नोकरी आणि चांगला हुद्दा पाहिला जातो. मात्र शेतकऱ्यांच्या मुला-मुलींशी कोणीही लग्न करण्यास तयार होत नाही. हुंडाबळीसारख्या अप्रवृत्ती रोखण्याबरोबरच सामूहिक विवाह सोहळे आयोजनाची मोठी जबाबदारी समाजावर आहे. तसेच बेटी बचाव उपक्रम सर्वच समाजबांधवांनी राबविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. आपल्याला आपल्या समाजाचा अभिमान असला पाहिजे, मात्र असे करताना अन्य समाजाचाही सन्मान करता आला पाहिजे. एका विचाराचा समाज असेल तर त्या समाजाची विकास व उन्नती लवकर होते. सुरुवातीला लेवा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय वायकुळे यांनी प्रास्ताविक केले, तर आमदार बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा एकनाथ खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)