शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधींवरील संशोधनातून आयुर्वेदाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:07 IST

मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून ती जीवनशैली आहे. निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब गरजेचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

नाशिक : मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून ती जीवनशैली आहे. निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब गरजेचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.  आयुर्वेदाचा भारतीय संस्कृतीशी थेट संबंध येतो. अ‍ॅलोपॅथीअगोदर आयुर्वेदानुसारच औषधोपचार केले जात होते. आयुर्वेदशास्त्राचे धडेदेखील महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातूनच गिरविले जातात. रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी नागरिकांकडून आजही आयुर्वेदावर विश्वास दाखविला जातो. आयुर्वेदाचा निसर्गाशी थेट संबंध असून, निसर्गामध्ये आढळणाऱ्या वनौषधींवर आयुर्वेदाचा औषधोपचार अवलंबून आहे.  त्यामुळे दिवसेंदिवस आयुर्वेदामध्ये संशोधन वाढत असून, नैसर्गिकरीत्या वनौषधींचा गुणधर्म शोधून त्याआधारे गोळ्या, द्रव्यरुप औषधे बाजारात उपलब्ध झाली आहे. केवळ काढा, जडीबुटी, तेल यापुरतेच आयुर्वेद मर्यादित राहिलेले नाहीतर त्याहीपलीकडे आयुर्वेद गेले आहे. आयुर्वेदाकडे एक जीवनशैली म्हणून जर बघितले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, लठ्ठपणा, थॉयराईड यांसारख्या आजारांवरदेखील मात करणे सहज शक्य असल्याचा दावा शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ करतात. आयुर्वेद औषधोपचाराद्वारे रोगाचे समूळ उच्चाटन शक्य आहे. आयुर्वेदाचा प्रभाव हळूहळू होतो किंवा उशिराने गुण येतो, हा गैरसमज नागरिकांनी दूर करण्याची गरज आहे. तसेच आयुर्वेदाचे दुष्परिणाम नाही, असे मुळीच नाही. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणामही असतात.- डॉ. प्रीती त्रिवेदी, एम.डीआयुर्वेदाची उपचारपद्धती दीर्घकालीन घ्यावी लागते हा गैरसमज दूर करावा. आयुर्वेदाच्या काही उपचार पद्धतीचे दुष्परिणामदेखील जाणवतात. आयुर्वेद उपचारपद्धती आजही तितकीच प्रभावशाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपचार आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेदामध्ये संशोधनाला खूप वाव आहे; मात्र त्यास अधिक गती देण्याची गरज वाटते.  - डॉ. शीतल सुरजुसे, बी.ए.एम.एस

टॅग्स :medicinesऔषधंdoctorडॉक्टर