शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

विंचूर गाव बंद न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:09 IST

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्यापारी असोसिएशन : गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निवेदन

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या विंचूरची कांदा मार्केटमुळे तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून नव्याने ओळख निर्माण होऊ लागली आहे. पंचक्र ोशीतील गावे व वाड्या-वस्त्यांमुळे येथील बाजारपेठेत दिवसभर छोटी-मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गाव असल्याने शिर्डी, नाशिककडे जाणारी लांब पल्ल्याची खासगी वाहने रस्त्यालगत असलेल्या दुकाने, हॉँटेलमध्ये नास्ता करण्यासाठी थांबत असल्याने वर्दळ सुरू असते. असे असले तरी व्यापाऱ्यांना नियमित दोन-तीन महिन्यांत होणाºया गाव बंदच्या निर्णयामुळे वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावातील दुकानदारांना सकाळी अचानक अमुक कारणामुळे गाव बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अथवा अगोदर रात्री बंदचा फलक तीनपाटीलगत लावला जातो. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील व्यापाºयांचे म्हणणे आहे. विशेष घटना अथवा योग्य कारण असल्यास आम्ही गाव बंदसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र राज्याच्या कानाकोपºयात कुठेतरी अप्रिय घटना घडते अथवा काही योग्य कारण नसतानाही अनेकदा ऊठसूट गाव बंद निर्णयामुळे सर्व दुकानदार हैराण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. अनेकदा अचानक गाव बंद ठेवल्यामुळे हॉटेल चालकांनी अगोदर घेतलेले दूध अथवा इतर पदार्थ दुसºया दिवशी खराब होत असल्याने अन्नपदार्थाच्या खराबीमुळे नाहक आर्थिक नुकसान अनेकदा सहन करावे लागल्याचे येथील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. काही अघटित घटना अथवा सार्वत्रिक बंदमध्ये लासलगावात बंद पाळल्यास दुपारनंतर दुकाने सुरू केली जातात. येथे मात्र दिवसभर बंद पाळावा लागत असल्याने अखेर संयम सुटलेल्या येथील व्यापारी वर्गाने याचा निषेध करीत पोलीस प्रशासनास निवेदन दिले. तसेच ग्रामपालिकेत याबाबत ठराव करण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.देश-विदेशात काहीही घटना, दुर्घटना घडली असता व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवावे असे सांगण्यात येते. यानंतरच्या काळात ज्या संघटना किंवा ज्या घटकांना गावात बंद करावयाचा असेल त्यांनी विंचूर पोलीस स्टेशन व विंचूर व्यापारी असोसिएशन यांना एक दिवस आधी लेखी माहिती कळवावी. त्यानंतर कारण योग्य वाटल्यास असोसिएशनच्या वतीने त्यावर निर्णय घेण्यात येऊन गाव बंद ठेवण्यात येईल. तसेच व्यापार-व्यवसाय दुपारी १२ वाजेपर्यंतच बंद ठेवण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन पोलीस प्रशासन व ग्रामपालिकेस व्यापारी वर्गाने दिले.