शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
4
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
5
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
8
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
11
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
12
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
13
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
14
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
15
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
16
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
17
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
18
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
19
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
20
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

विंचूर गाव बंद न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:09 IST

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्यापारी असोसिएशन : गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निवेदन

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या विंचूरची कांदा मार्केटमुळे तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून नव्याने ओळख निर्माण होऊ लागली आहे. पंचक्र ोशीतील गावे व वाड्या-वस्त्यांमुळे येथील बाजारपेठेत दिवसभर छोटी-मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गाव असल्याने शिर्डी, नाशिककडे जाणारी लांब पल्ल्याची खासगी वाहने रस्त्यालगत असलेल्या दुकाने, हॉँटेलमध्ये नास्ता करण्यासाठी थांबत असल्याने वर्दळ सुरू असते. असे असले तरी व्यापाऱ्यांना नियमित दोन-तीन महिन्यांत होणाºया गाव बंदच्या निर्णयामुळे वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावातील दुकानदारांना सकाळी अचानक अमुक कारणामुळे गाव बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अथवा अगोदर रात्री बंदचा फलक तीनपाटीलगत लावला जातो. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील व्यापाºयांचे म्हणणे आहे. विशेष घटना अथवा योग्य कारण असल्यास आम्ही गाव बंदसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र राज्याच्या कानाकोपºयात कुठेतरी अप्रिय घटना घडते अथवा काही योग्य कारण नसतानाही अनेकदा ऊठसूट गाव बंद निर्णयामुळे सर्व दुकानदार हैराण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. अनेकदा अचानक गाव बंद ठेवल्यामुळे हॉटेल चालकांनी अगोदर घेतलेले दूध अथवा इतर पदार्थ दुसºया दिवशी खराब होत असल्याने अन्नपदार्थाच्या खराबीमुळे नाहक आर्थिक नुकसान अनेकदा सहन करावे लागल्याचे येथील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. काही अघटित घटना अथवा सार्वत्रिक बंदमध्ये लासलगावात बंद पाळल्यास दुपारनंतर दुकाने सुरू केली जातात. येथे मात्र दिवसभर बंद पाळावा लागत असल्याने अखेर संयम सुटलेल्या येथील व्यापारी वर्गाने याचा निषेध करीत पोलीस प्रशासनास निवेदन दिले. तसेच ग्रामपालिकेत याबाबत ठराव करण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.देश-विदेशात काहीही घटना, दुर्घटना घडली असता व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवावे असे सांगण्यात येते. यानंतरच्या काळात ज्या संघटना किंवा ज्या घटकांना गावात बंद करावयाचा असेल त्यांनी विंचूर पोलीस स्टेशन व विंचूर व्यापारी असोसिएशन यांना एक दिवस आधी लेखी माहिती कळवावी. त्यानंतर कारण योग्य वाटल्यास असोसिएशनच्या वतीने त्यावर निर्णय घेण्यात येऊन गाव बंद ठेवण्यात येईल. तसेच व्यापार-व्यवसाय दुपारी १२ वाजेपर्यंतच बंद ठेवण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन पोलीस प्रशासन व ग्रामपालिकेस व्यापारी वर्गाने दिले.