शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर गाव बंद न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:09 IST

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्यापारी असोसिएशन : गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निवेदन

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या विंचूरची कांदा मार्केटमुळे तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून नव्याने ओळख निर्माण होऊ लागली आहे. पंचक्र ोशीतील गावे व वाड्या-वस्त्यांमुळे येथील बाजारपेठेत दिवसभर छोटी-मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गाव असल्याने शिर्डी, नाशिककडे जाणारी लांब पल्ल्याची खासगी वाहने रस्त्यालगत असलेल्या दुकाने, हॉँटेलमध्ये नास्ता करण्यासाठी थांबत असल्याने वर्दळ सुरू असते. असे असले तरी व्यापाऱ्यांना नियमित दोन-तीन महिन्यांत होणाºया गाव बंदच्या निर्णयामुळे वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावातील दुकानदारांना सकाळी अचानक अमुक कारणामुळे गाव बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अथवा अगोदर रात्री बंदचा फलक तीनपाटीलगत लावला जातो. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील व्यापाºयांचे म्हणणे आहे. विशेष घटना अथवा योग्य कारण असल्यास आम्ही गाव बंदसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र राज्याच्या कानाकोपºयात कुठेतरी अप्रिय घटना घडते अथवा काही योग्य कारण नसतानाही अनेकदा ऊठसूट गाव बंद निर्णयामुळे सर्व दुकानदार हैराण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. अनेकदा अचानक गाव बंद ठेवल्यामुळे हॉटेल चालकांनी अगोदर घेतलेले दूध अथवा इतर पदार्थ दुसºया दिवशी खराब होत असल्याने अन्नपदार्थाच्या खराबीमुळे नाहक आर्थिक नुकसान अनेकदा सहन करावे लागल्याचे येथील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. काही अघटित घटना अथवा सार्वत्रिक बंदमध्ये लासलगावात बंद पाळल्यास दुपारनंतर दुकाने सुरू केली जातात. येथे मात्र दिवसभर बंद पाळावा लागत असल्याने अखेर संयम सुटलेल्या येथील व्यापारी वर्गाने याचा निषेध करीत पोलीस प्रशासनास निवेदन दिले. तसेच ग्रामपालिकेत याबाबत ठराव करण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.देश-विदेशात काहीही घटना, दुर्घटना घडली असता व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवावे असे सांगण्यात येते. यानंतरच्या काळात ज्या संघटना किंवा ज्या घटकांना गावात बंद करावयाचा असेल त्यांनी विंचूर पोलीस स्टेशन व विंचूर व्यापारी असोसिएशन यांना एक दिवस आधी लेखी माहिती कळवावी. त्यानंतर कारण योग्य वाटल्यास असोसिएशनच्या वतीने त्यावर निर्णय घेण्यात येऊन गाव बंद ठेवण्यात येईल. तसेच व्यापार-व्यवसाय दुपारी १२ वाजेपर्यंतच बंद ठेवण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन पोलीस प्रशासन व ग्रामपालिकेस व्यापारी वर्गाने दिले.