शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

देशवंडी येथे जलसाक्षता अभियानांर्तगत गाळ उपशाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:22 IST

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे शासन, युवामित्र व टाटा ट्रस्टच्यावतीने जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी हे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला. याअंतर्गत जलसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे शासन, युवामित्र व टाटा ट्रस्टच्यावतीने जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी हे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला. याअंतर्गत जलसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.टाटा ट्रस्टच्या सहकार्याने युवा मित्र या संस्थेच्या वतीने तालुक्यातील देशवंडी येथे शेतकऱ्यांचे जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली. तसेच ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. गावातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवा मित्र महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे . यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार आहे . उपसलेला गाळ शेतकर्यांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात घेऊन जायचा आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल तसेच पुढे या जलसाठ्यांवर पाणी वापर संस्था स्थापन करून त्या पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन शेतकरी स्वत: करतील असे लोणारे यांनी यावेळी सांगितलेकार्यक्रमास युवा मित्र संस्थेचे सोमनाथ वाघ, वैभव आव्हाड, सरपंच वनीता कापडी, उपसरपंच सुभाष बर्के, भाऊसाहेब कापसे,बाळु कापडी, ज्ञानेश्वर नागरे, देविकसन बर्के,उत्तम कापडी, जगन चकणे, चिंधु डोमाडे, संजय कर्डक, नवनाथ बर्के, शरद कापडी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते .

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती