शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गिरणारेरोडवरील दशक्रियाविधी शेडची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:12 IST

गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावर कोट्यवधी रुपये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गंगापूरगाव : गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावर कोट्यवधी रुपये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.गिरणारे दुगाव तसेच पंचक्रोशितील नागरिक याठिकाणी दशक्रि या विधीसाठी येत असतात. त्यांना विधिवत कार्यक्र मासाठी चांगली जागा म्हणून गोदावरी नदीवरील पुलाखाली शासनाच्या वतीने आमदार- खासदार निधीमधून दशक्रि या शेडची निर्मिती केली जाते, मात्र शासनाच्या गुणनियंत्रण विभाग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्याचे प्रमाणपत्र सढळ हाताने दिले जात असल्याचे या दशक्रि या शेडची अवस्था बघून वाटते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे हे शेड जेव्हा बांधण्यात आले, त्याच्या दोन-तीन महिन्याने शेडचे वरचे पत्रे उडून गेले, त्यानंतर ते पत्रे संबंधित ठेकेदाराने बसविल्यानंतर काही महिन्याने शेडच्या पायाखालची वाळू सरकून जमिनीत काँक्रीट असतानाही मोठे भगदाड पडले. कोट्यवधी रु पये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी तशेच काम पूर्णत्वाचा दाखला देणारे सर्व अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल गिरणारे आणि दुगावमधील नागरिकांनी केला आहे.यासंदर्भात गिरणारे गटाच्या अर्पणा खोसकर यांच्याशी पत्रव्यवहार झाले असून, निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यावर अजून चांगल्याप्रमाणे काम करण्याचे त्यांनी सांगितले आहे. याठिकाणी गिरणारे, दुगाव, नाईकवाडी, साडगाव नागलवाडी, आभाळेवाडी आदी भागांतील नागरिक येथे दशक्रि याविधीसाठी येतात. महिलांसाठी किंवा पुरु षांसाठी कपडे बदलण्याची रूम, पाणीची वेवस्था, लाइट तसेच महिला-पुरु षांसाठी शौचालायची व्यवस्था आदी सर्व सुविधा देणार आहे.- अनिल थेटे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nashikनाशिक