शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाणीपुरवठा योजनांचे बिघडले अर्थचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:51 IST

नगरसूल : जागतिक बॅँकेने गौरविलेल्या आणि राज्यात यशस्वी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. नफ्यात चालणाºया या योजनेचे सध्या ४८ लाख रुपये ग्रामपंचायतींकडे थकले असून, ग्रामपंचायतींनाही वसुलीत अडचणी निर्माण होत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींकडे थकबाकी : येवल्यातील ३८ गाव पाणीयोजना अडचणीत; वसुली ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनगरसूल : जागतिक बॅँकेने गौरविलेल्या आणि राज्यात यशस्वी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. नफ्यात चालणाºया या योजनेचे सध्या ४८ लाख रुपये ग्रामपंचायतींकडे थकले असून, ग्रामपंचायतींनाही वसुलीत अडचणी निर्माण होत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे.येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना आजही राज्यातील यशस्वी योजना म्हणून गणली जाते. या योजनेवर परिसरातील अनेक गावांची तहान भागविलीजाते़ जागतिक बँकेने केलेल्या सर्व्हेत सर्वाधिक यशस्वीपणे चालणारी ही योजना मानली गेली आहे. तेलंगणातील समितीकडूनही या योजनेचा अभ्यास झाला आहे. तब्बल ३५ च्या वर गावे टँकरमुक्त करून अखंडितपणे ही योजना शासनाच्या एक रु पयाही अनुदान न घेता नफ्यात सुरू आहे. भर उन्हाळ्यात व दुष्काळातही या योजनेने अर्धा तालुका टँकरमुक्त ठेवला. मात्र कोरोनाच्या महामारीत झालेल्या लॉकडाऊनमध्ये योजनेची काहीशी वाताहत झाली. त्यामुळे योजनेचे ग्रामपंचायतींकडे तब्बल ४८ लाख रु पये थकले आहेत. ग्रामपंचायतींची पाणीपट्टी आल्याने पाटबंधारे विभागाला २५ लाख रु पयांचे देणेप्रलंबित आहे. धुळगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, एरंडगाव, जळगाव नेऊर, मानोरी, नगरसूल, सायगाव, सुरेगाव रस्ता, अंदरसूल, उंदीरवाडी, आडगाव चोथवा, अंगणगाव, निमगाव मढ, अनकुटे, विसापूर व इतर ग्रामपंचायतींकडे मोठी थकबाकी आहे. त्यामुळे या गावासह परिसरात पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे़ सव्वाचार लाख रुपये वीजबिल ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार व प्रशासनानेही ग्रामपंचायतींना पत्र देऊन थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या आहेत. नफ्यातील योजनेला ग्रहण लागल्याने योजना सुरळीत चालण्यासाठी ग्रामपंचायतीने थकबाकी भरणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पालखेडचे व वीजबिलाचे देणे बाकी आहे आणि येणे ४८ लाख रु पये असून, योजना आजही नफ्यातच आहे, मात्र थकबाकीमुळे अर्थचक्र बिघडले आहे.सुरुवातीला ३८ गावांपुरतीच मर्यादित असलेल्या या योजनेला आता नगरसूल रेल्वे, अंकाई रेल्वे, पोलीस वसाहत, औद्योगिक वसाहतीसह संस्था व गावे जोडल्याने सद्यस्थितीत ५९ गावांना योजनेचे पाणी पोहोचत आहे. लॉकडाऊनमुळे पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. योजनेचा खर्च पाहता ग्रामपंचायतींनी वसुली करून आमची पाणीपट्टी द्यावी. आमच्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने सॅनिटायझर खरेदी करून वापरले आहेत.- मोहन शेलार, उपाध्यक्ष, पाणीपुरवठा योजना समिती वर्षांनुवर्षे आम्ही पाणीपट्टी भरत आहोत, मात्र लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने ग्रामस्थांकडे वसुलीसाठी जाता आले नाही. नागरिक अडचणीत असल्याने वसुलीसाठी तगादा करता येत नाही. ग्रामपंचायती पाणीपट्टी भरणारचआहे.- प्रसाद पाटील, सरपंच, नगरसूल

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण