शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश :स्वामी स्वरुपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 22:00 IST

एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत.

ठळक मुद्देराग, द्वेषामुळे माणसाचे अध:पतन माणूस या भोगवासनेचा बळी ठरतो

नाशिक : मन शांत व क्रोधमुक्त असेल तरच तुम्हाला आत्मशांती लाभेल. शांती नाहिसी होण्यास तुमची जन्म वेळ, ठिकाण किंवा प्रारब्ध जबाबदार नाही तर तुम्ही स्वत: जबाबदार आहे. राग, द्वेषामुळे माणसाचे अध:पतन होत जाते हे भगवतगितेत भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. असे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपिठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि.७) सरस्वती यांनी गुंफले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप यतेया रविवारी (दि.१२) होणार आहे. एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी ते म्हणाले, राग, द्वेषामुळे भोगवासनेची निर्मिती होते आणि माणूस या भोगवासनेचा बळी ठरतो अणि स्वत:सह दुस-यांनाही त्रासाचे कारण ठरतो. माणूस हा बुध्दीवान प्राणी असून त्याला विचार करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे पांडित्य विदवत्ता मिळविल्यानंतर माणूस स्वैराचार, भ्रष्टाचाराच्या मार्गावर का जातो ? पशुतुल्य हिंस्र प्राण्याप्रमाणे तो का वागतो? याचा शोध घेतला पाहिजे.

 

टॅग्स :Nashikनाशिक