शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

भगूर शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत बांधकामे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:08 IST

शहरात गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारी भगूर नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. नगरपालिकेच्या या धाडसी पावलाचे अनेकांनी स्वागत केले.

ठळक मुद्देनगरसेवकही सुटले नाहीत । नागरिकांकडून अडथळे

भगूर : शहरात गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारी भगूर नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. नगरपालिकेच्या या धाडसी पावलाचे अनेकांनी स्वागत केले.भगूर शहरात विनापरवाना नगरपालिकेच्या जागेवर टपऱ्या, कच्च्या पत्र्याची घरे, पायºया, सीमेंटचे ओटे उभारून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. शहरात जागोजागी अतिक्रमणाचे पेव फुटल्याने त्यातून रस्ता वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला होता. यासंदर्भात वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अखेर नगरपालिकेने बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात मोहीम राबविण्याचे ठरवून तीन दिवसांपासून गावात दवंडी पिटली व बेकायदेशीर बांधकाम, नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले. त्यास फारसा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, बांधकाम अभियंता रमेश कांगणे, पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे, स्वच्छता निरीक्षक सागर गायकवाड, मालमत्ता अधिकारी मोहन गायकवाड, अनिल बिजलपुरे, रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साह्याने प्रथम शिवसेना नगरसेविका कविता यादव यांच्या बंगल्यासमोरील ओटा व पाºया काढल्या. त्यानंतर माजी नगरसेवक अजय लोट यांचे कार्यालय, कातकाडे, शेख, पठाण यांच्या घराच्या पायºया तर राममंदिररोड येथील योगीता घोलप, चौधरी यांची लोखंडी टपरी जप्त केली. भाऊसाहेब ससाणे यांचे अतिक्रमित दुकान, द्रौपदाबाई मोरे यांच्या गोठ्यासह रस्त्यावरील पाण्याचे ड्रम, टपºया आदी वस्तू जप्त केल्या. राम मंदिररोड, दत्त मंदिर विभाग, मोठा गणपती परिसर, चिंचबन, आठवडे बाजार, पंचशीलनगर आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेच्या या मोहिमेमुळे नाराज झालेल्या नागरिकांनी अतिक्रमण पथकातील अधिकारी, कर्मचाºयाशी हुज्जत घालून गोंधळ घातला, दरम्यान, शहरात अजूनही काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून, नागरिकांनी ते काढून घ्यावे अन्यथा धडक मोहिमेत ते काढून टाकण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिला आहे. तर नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिलेली नाही, अशी तक्रार करून या मोहिमेत गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला गेल्याचा आरोपही काहींनी केला.तीस वर्षांपूर्वीची आठवणभगूर शहरात साधारणत: ३० वर्षांपूर्वी भगूरचे तत्कालीन नगराध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी अतिक्रमण मोहीम राबविली होती. त्यात अतिक्रमित अनेक पक्क्या घरांच्या भिंतीही पाडण्यात आल्या, तर मारवाडी गल्लीतील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यावेळीदेखील अतिक्रमणधारकांनी नगरपालिकेवर संताप व्यक्त केला होता. अतिक्रमण मोहीम राबविल्यामुळेच त्यानंतरच्या निवडणुकीत बलकवडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शनिवारच्या मोहिमेनंतर शहरात पुन्हा एकदा तीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण