शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

भगूर शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत बांधकामे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:08 IST

शहरात गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारी भगूर नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. नगरपालिकेच्या या धाडसी पावलाचे अनेकांनी स्वागत केले.

ठळक मुद्देनगरसेवकही सुटले नाहीत । नागरिकांकडून अडथळे

भगूर : शहरात गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारी भगूर नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. नगरपालिकेच्या या धाडसी पावलाचे अनेकांनी स्वागत केले.भगूर शहरात विनापरवाना नगरपालिकेच्या जागेवर टपऱ्या, कच्च्या पत्र्याची घरे, पायºया, सीमेंटचे ओटे उभारून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. शहरात जागोजागी अतिक्रमणाचे पेव फुटल्याने त्यातून रस्ता वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला होता. यासंदर्भात वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अखेर नगरपालिकेने बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात मोहीम राबविण्याचे ठरवून तीन दिवसांपासून गावात दवंडी पिटली व बेकायदेशीर बांधकाम, नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले. त्यास फारसा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, बांधकाम अभियंता रमेश कांगणे, पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे, स्वच्छता निरीक्षक सागर गायकवाड, मालमत्ता अधिकारी मोहन गायकवाड, अनिल बिजलपुरे, रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साह्याने प्रथम शिवसेना नगरसेविका कविता यादव यांच्या बंगल्यासमोरील ओटा व पाºया काढल्या. त्यानंतर माजी नगरसेवक अजय लोट यांचे कार्यालय, कातकाडे, शेख, पठाण यांच्या घराच्या पायºया तर राममंदिररोड येथील योगीता घोलप, चौधरी यांची लोखंडी टपरी जप्त केली. भाऊसाहेब ससाणे यांचे अतिक्रमित दुकान, द्रौपदाबाई मोरे यांच्या गोठ्यासह रस्त्यावरील पाण्याचे ड्रम, टपºया आदी वस्तू जप्त केल्या. राम मंदिररोड, दत्त मंदिर विभाग, मोठा गणपती परिसर, चिंचबन, आठवडे बाजार, पंचशीलनगर आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेच्या या मोहिमेमुळे नाराज झालेल्या नागरिकांनी अतिक्रमण पथकातील अधिकारी, कर्मचाºयाशी हुज्जत घालून गोंधळ घातला, दरम्यान, शहरात अजूनही काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून, नागरिकांनी ते काढून घ्यावे अन्यथा धडक मोहिमेत ते काढून टाकण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिला आहे. तर नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिलेली नाही, अशी तक्रार करून या मोहिमेत गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला गेल्याचा आरोपही काहींनी केला.तीस वर्षांपूर्वीची आठवणभगूर शहरात साधारणत: ३० वर्षांपूर्वी भगूरचे तत्कालीन नगराध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी अतिक्रमण मोहीम राबविली होती. त्यात अतिक्रमित अनेक पक्क्या घरांच्या भिंतीही पाडण्यात आल्या, तर मारवाडी गल्लीतील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यावेळीदेखील अतिक्रमणधारकांनी नगरपालिकेवर संताप व्यक्त केला होता. अतिक्रमण मोहीम राबविल्यामुळेच त्यानंतरच्या निवडणुकीत बलकवडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शनिवारच्या मोहिमेनंतर शहरात पुन्हा एकदा तीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण