शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आडात असूनही नांदगावकरांचा पोहरा रिकामाच!

By admin | Updated: February 18, 2016 22:42 IST

उद्धवा, अजब तुझे सरकार : पाणीसंकटाने नांदगावकर त्रस्त

संजीव धामणे नांदगाव‘घडलंय बिघडलंय’ सारखी नांदगावच्या पाणीपुरवठ्याची स्थिती झालीय. आडात असूनही पोहऱ्यात पाणी येत नाही. प्रत्येक आवर्तनाचा वाढत जाणाऱ्या कालावधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. दहा दिवसांचा पाणीपुरवठा पंधरा/सतरा दिवसांवर येऊन पोहोचला आहे. दरम्यान, पदाचा आवर्तन कालावधी संपल्याने भावी नगराध्यक्षांनी खुर्चीसाठी कंबर कसली आहे. पाणी वाहून मात्र नागरिकांच्या कंबरा वाकड्या झाल्या आहेत.शहराला गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व माणिकपुंज धरण या दोन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. शहराची मूळ योजना दहेगाव धरणातून असून, ते चार वर्षांपासून कोरडेठाक पडले आहे. गिरणा धरण योजना जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग चालवतो. नांदगाव येथील जलकुंभापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र नगरपालिका हद्दीतले वितरण पालिकेकडे आहे. वितरणाचे तब्बल ४४ भाग आहेत. काही व्हॉल्व्ह बदलले व प्रशासकीय सुसूत्रता आणली तर आवर्तन कालावधी कमी करणे सहज शक्य आहे. गेले तीन-चार महिने यावर मंथन सुरू आहे. पण कृतिशून्य व कागदोपत्रीच मंथन सुरू असल्याने आवर्तनागणिक नागरिकांच्या हालअपेष्टा वाढत चालल्या आहेत. त्यात नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागल्याने ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असे म्हणायची वेळ आली आहे. नगरसेवक तेच.. पण जोडीला प्रशासनाची कूर्मगती अनाकलनीय आहे. वितरण व्यवस्थेत ८० ते ९० व्हॉल्व्ह आहेत. त्यापैकी १० ते १२ व्हॉल्व्ह जुने झाल्याने अकार्यक्षम झाले आहेत. काही ठिकाणी नवीन बसवणे गरजेचे असून, त्यासाठी काही लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सहा महिन्यांपूर्वी ही समस्या भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार असल्याचे संकेतही मिळाले होते. पण कार्यवाहीचे ‘कासव’ स्वभावगुणानुसार संथ गतीनेच काम करत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाकडे किती पाठपुरावा केला हा संशोधनाचा विषय आहे. तसाच मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांच्याकडून जनतेने गतिमान प्रशासनासाठी अपेक्षा व्यक्त केली तर वावगे ठरू नये. यासंदर्भात प्रांताधिकारी वासंती माळी यांनी त्यांना पत्रही दिले आहे. घंटागाडीसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. प्रशासकीय मान्यता चार लाख १६ हजार रुपयांना मिळाली. याला झाले वर्ष.. अद्याप घंटाही नाही व गाडीसुद्धा नाही. प्रत्येक बुधवारी अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. तीन बुधवारनंतर तिचेही सूप वाजले. जोमाने अतिक्रमणधारकांनी तथास्तुचा उद्घोष करत पुन्हा जागा बळकावल्या. पालिकेने हाती घ्यावयाच्या इतर मूलभूत सुविधा व गरजांची वाट लागल्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याची वाटचालही त्याच दिशेने सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र पाणी जीवनावश्यक असून त्यासाठी भविष्यात हातघाईचे प्रसंग येऊ नयेत.