शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अपात्र असतानाही पुन्हा लढण्याचा मोह नडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 01:14 IST

ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र असतानाही दाखल केलेले अर्ज तसेच जातप्रमाणपत्र आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर अनेक उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले. गुरुवारी झालेल्या अर्ज छाननीत अपूर्ण भरलेल्या अर्जांनाही बाद ठरविण्यात आले. विशेष म्हणजे शौचालय वापराच्या मुद्द्यावर एकही अर्ज बाद झालेला नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : जातवैधता दाखल्याबाबतचीही कारणे

नाशिक : ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र असतानाही दाखल केलेले अर्ज तसेच जातप्रमाणपत्र आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर अनेक उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले. गुरुवारी झालेल्या अर्ज छाननीत अपूर्ण भरलेल्या अर्जांनाही बाद ठरविण्यात आले. विशेष म्हणजे शौचालय वापराच्या मुद्द्यावर एकही अर्ज बाद झालेला नाही.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जवळपास १६ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची तालुकानिहाय छाननी करण्यात आली, त्यातील अनेक उमेदवारांचे अर्ज हे अनेकविध कारणांनी अपात्र ठरले. त्यामध्ये मागील निवडणुकीचा खर्च सादर न केलेले आणि त्यामुळे पुढील निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आलेल्या उमेदवारांना फटका बसला. मागील निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविलेले आहे. अशाच काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या इच्छुकांचे मनसुबे छाननीत उधळले गेले.

अर्ज बाद होण्यामध्ये बहुतांश कारणे ही मागील निवडणुकीतील अपात्रतेची आहेत, तसेच जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रकरण सादर केल्याची पावती किंवा तसे पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या इच्छुकांना देखील निवडणुकीच्या पायरीवरून उतरावे लागले. शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

गेल्या २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला होता, त्यानंतर दोन दिवसांनी राज्य निवडणूक आयोगाने किमान शालेय शिक्षणातील इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असल्याखेरीज किंवा सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केल्याप्रमाणे सातवी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक अर्हता असल्याखेरीज त्यांना निवडणूक लढता येणार नसल्याचे सुधारित आदेश काढले होते. त्यामुळे पहिले दोन दिवस अर्ज दाखल केलेल्या अनेकांना डमी अर्ज करण्याची वेळ आली; मात्र शैक्षणिक कारणावरून अर्ज बाद होण्याचे प्रकार घडले नाहीत.

--इन्फो--

पतिराजाने केलेले अतिक्रमण ठरले कारणीभूत

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचा फटका हा काही महिला उमेदवारांना बसला. त्यांच्या पतिराजांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे पुरावे समोर आल्याने आणि तशा नोंदी देखील असल्यामुळे अशा महिला उमेदवारांना तर काही प्रत्यक्ष उमेदवारांनाही अवैध ठरविण्यात आले.

 

पूर्वीचे अपात्र छाननीत बाद

मागील निवडणुकीचा खर्च सादर करू न शकलेले उमेदवार पुढील निवडणूक लढण्यास अपात्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते, असे असतानाही पूर्वी अपात्र ठरलेल्यांना या निवडणुकीत उभे राहण्याचा मोह काही आवरता आला नाही. अशा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखलही केले होते; परंतु छाननीत त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक