शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

उपसचिव साबळे आज चौकशीसाठी हजर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील दोन वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय ...

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील दोन वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेेत चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड हे या चौकशीचे प्रमुख असून, गुरुवारपासून (दि. २७) आरटीओमधील विविध अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. सोमवारी (दि. ३१) तक्रारदार पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सकाळी ११ वाजता ते पहिल्यांदाच पोलीस आयुक्तालयात आले. आतापर्यंत केवळ ई-मेलद्वारे ते संवाद साधत होते आणि प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरून प्रत्यक्षपणे चौकशीला सामोरे जात नव्हते. दिवसभर आयुक्तालयाच्या वास्तूमधील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. यामुळे आयुक्तालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

--इन्फो--

चौकशीच्या पहिल्या दिवशी काही पुरावे केले सुपूर्द

पाटील यांच्या चौकशीमधून काही बाबी समोर आल्या असून, त्यांनी केलेल्या आरोपांशी संबंधित काही पुरावेही पोलिसांकडे सोमवारी दिले आहेत. संध्याकाळी पाच वाजता त्यांना पुन्हा प्रकृतीचा त्रास होऊ लागल्याने चौकशी थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ते आज, मंगळवारी अजून काही पुरावे आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांकडे दाखल करण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत आयुक्तालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. तसेच बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.

--इन्फो---

साबळे यांच्याविरुद्ध २५ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन मंत्रालयातील उपसचिव प्रकाश साबळे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. वर्ध्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे परब यांच्या अत्यंत जवळचे आहेत, असेही तक्रारीत म्हटले आहे. यामुळेच मागील सहा वर्षांपासून साबळे हे परिवहन विभागाच्या उपसचिव पदावर टिकून आहेत. त्यांची बदली अन्य कुठल्याही मंत्रालयाच्या खात्यात केली गेली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपये गिळंकृत केल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.