शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:33 IST

देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे.

ठळक मुद्देसौर ऊर्जेवर विविध प्रकारचे संशोधन मित्राच्या उद्योगाच्या नावाने उद्योग

नाशिक : देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. सौर ऊर्जेवर चालणाºया आॅटो रिक्षा तयार करणाºया नाशिकच्या युवकाला या उदासीन यंत्रणेमुळे स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य होत नाही आणि संशोधनही शक्य होत नसल्याने सरकारी भरवशावर काय प्रगती करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अंकुश मागजी असे या युवकाचे नाव! अवघ्या ३२ वर्षांचा या नाशिककर तरुणाने गेल्या पाच वर्षांत सौर ऊर्जेवर विविध प्रकारचे संशोधन करून दुचाकीपासून तीनचाकीपर्यंत इंधनाशिवाय ग्रीन एनर्जीतून धावायला लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर व्यावसायिक स्तरावर तयार केलेल्या चेतक आणि सौर मित्र या दोन प्रकारच्या १९ रिक्षा विविध राज्यात विकल्या गेल्या आहेत, परंतु त्यासाठी त्याला स्वत:चा कायदेशीर उद्योग मात्र सुरू करता आलेला नसून केवळ मित्राच्या उद्योगाच्या नावाने हा उद्योग किती दिवस करणार? असा प्रश्न अंकुशपुुढे निर्माण झाला आहे. अंकुश मागजी याचे खरे तर तांत्रिक शिक्षण झालेले नाही. पारंपरिक शिक्षण अवघे अकरावीपर्यंत. परंतु तरीही काहीतरी शोध घेण्याच्या आणि धडपड्या वृत्तीमुळे त्याने सौर ऊर्जेवर चालणाºया वाहनांसाठी वाहून घेतले आहे. सातवीत असतानाच एका रिक्षाच्या मागून निघणाºया धुरामुळे इंधनाला वेगळा पर्याय नसेल काय? या प्रश्नाने त्याला अनेक बाबींचा शोध घेण्यास भाग पडले. मग, शोध आणि अभ्यासाअंती ग्रीन पेट्रोल किंवा इंधनाचे अनेक पर्याय पुढे आले. त्यातून त्याने ‘सौर ऊर्जा’ हा विषय निवडला. २०१० मध्ये त्याने सोलर वॉटर हिटर, सोलर एनर्जी या विषयांवर काम केले. त्यांनतर त्यांनी सौर ऊर्जेवर चालणाºया दुचाकींवर काम सुरू केले त्यात त्याला यश आले. आर्थिक तुलनाच केली, तर पारंपरिक दुचाकीपेक्षा पाच रुपयांत ६० किलोमीटर धावणारी हा शोध खूपच क्रांतिकारी ठरू शकतो, असे अंकुशला वाटले. मग त्याने रिक्षांकडे लक्ष पुरवले. साचा तयार करून घेण्याचे काम मित्राच्या उद्योगात करून नंतर जमेल त्या साधनांचा जुगाड करीत त्याने रिक्षा तयार केली. त्यासाठी खास आकाराची पॅनल्सलाही तयार केली. पुढे संशोधनासाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागल्यानंतर बॅँक आॅफ महाराष्टÑकडे मदत मागितली. बॅँकेने पाच लाख रुपयांचे साहाय्य केले, जे पुरसे नव्हते परंतु तरीही त्यातून बरेच काम झाले. प्रयोग यशस्वी ठरल्यांनतर २०१४ मध्ये त्याने केंद्र सरकारकडे उद्योगासाठी अर्ज केला. ९ आॅक्टोबर २०१५ रोजी त्याला उद्योग परवाना मिळाला आणि १ मार्च २०१६ रोजी त्याने पहिली रिक्षा रस्त्यावर आणली. स्थानिक पातळीवर रिक्षाचालकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने आॅनलाइनवरून विक्रीची व्यवस्था केली. त्याला बाहेरील राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला आणि विशाखापट्टणमचा एक ग्राहक मिळाला. पुढे एकेक करीत तब्बल १९ रिक्षांची विक्री झाली असून, त्यात विशाखापट्टणमबरोबरच कोलकाता, विजयवाडा, अहमदाबाद येथील ग्राहकांनी प्रतिसाद दिला.