शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पोषण आहार वाटपाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:29 IST

मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला बेमुदत संप पंधरा दिवस उलटूनही सुरूच आहे. या संपामुळे वरखेडा परिसरातील बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. आमची अंगणवाडीची ताई केव्हा येणार? आम्ही रोज त्रास देतो म्हणून आमच्या ताईला राग आला का, असा निरागस प्रश्न अंगणवाडीतील बालके आपल्या आईवडिलांना विचारत आहे. त्यामुळे संपावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांमधूनही होत आहे.

वरखेडा : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला बेमुदत संप पंधरा दिवस उलटूनही सुरूच आहे. या संपामुळे वरखेडा परिसरातील बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. आमची अंगणवाडीची ताई केव्हा येणार? आम्ही रोज त्रास देतो म्हणून आमच्या ताईला राग आला का, असा निरागस प्रश्न अंगणवाडीतील बालके आपल्या आईवडिलांना विचारत आहे. त्यामुळे संपावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांमधूनही होत आहे.  मानधनात वाढ करावी, टेक होम रेशन (टीएचआर) बंद करावा, शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोयी -सुविधा मिळाव्या आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने राज्यभर ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला अंगणवाडी कर्मचाºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बालविकास विभागाने संघटनेसोबत मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेतल्या. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सेवाज्येष्ठतेनुसार व शिक्षणावर आधारित मानधन वाढ देण्यात यावी ही कर्मचाºयांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे शासनाचा हा प्रस्ताव धुडकावत बेमुदत संप कायम ठेवला आहे.  संपाबाबत सन्माननीय तोडगा निघत नसल्याने लाभार्थी बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्यासाठी शासनाच्या वतीने स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक  यांची एक समिती गठित करून त्यामार्फत आहार पुरवठा करणारे बचतगट आणि आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या लाभार्थींना पोषण आहार व आरोग्यसेवा देण्यात याव्यात, असा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला  आहे तसे आदेशही स्थानिक पातळीवरील घटकांना दिले आहेत. परंतु त्यातही प्रशासनाला अडचणी जाणवत आहेत.बचतगट पोषण आहार शिजवून देण्यास तयारआहेत; पण वाटप करण्यास नाखुशी दर्शवत आहेत. त्याबरोबरच संप कालावधीतील पोषण आहाराची देयके मिळतील का? याबाबतही सांशक आहेत. तसेच तीन ते सहा वयोगटातील लाभार्थींची यादी अंगणवाडी सेविकेकडे असते त्यामुळे आहार वाटपात अनंत अडचणी येण्याची शक्यता जास्त आहे.