शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जायगाव ते सप्तश्रृंगी गड पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:43 IST

नायगाव: श्रीक्षेत्र वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले.

नायगाव: श्रीक्षेत्र वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले. कै. हरिभाऊ दिघोळे यांनी सुरु केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा २१ वे वर्ष आहे.रविवारी सकाळी सहा वाजता जायगाव येथे सरपंच नलिनी गिते यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडी सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेचे सप्तश्रृंगी गडाकडे प्रस्थान झाले. सरपंच गिते यांनी भाविकांसाठी टीशर्ट तर पायी दिंडी सोहळा समितीने पदयात्रेत सहभागी भाविकांच्या भोजनाची व सामानासाठी टेम्पोची व्यवस्था केली आहे.सकाळी सिन्नर-सायखेडा रस्त्याने माळेगाव, मापारवाडी, नायगाव आदि गावांतून अनेक पायी दिंड्याचे गडाच्या दिशेने प्रस्थान झाले. भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फूलून गेला होता. देवीच्या नावाने घोषणा देत व जयजयकार करीत जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. पायी दिंडी सोहळ्यात भिमा गिते, महेंद्र सांगळे, गोविंद दिघोळे, भानूदास काकड, संतोष दिघोळे, सचिन गिते, भाऊसाहेब केदार, रमेश आव्हाड, सुरेश गायकवाड, महेंद्र सांगळे, देविदास खाडे, जयराम गामणे, सुरेश गायकवाड, सुरेश हुल्लारे, सोमनाथ चेवले, सदाशिव गायकवाड, अतुल गिते, लक्ष्मण केदार, मारुती बर्के, आदींसह ५० ते ६० भाविक सहभागी झाले. 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर