शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

मागणी : पाटबंधारे विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय

देवळा : टंचाई आढावा बैठकीत देवळा तालुक्यात दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता व या कालव्याच्या इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी पाटबंधारे विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या होत असलेल्या वाळू उपशाबद्दल यावेळी तक्रारी करण्यात येऊन प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.देवळा येथे आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गत दीड महिन्यांपासून देवळा तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु तो पुरेसा नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आल्याने लोकसंख्येच्या प्रमाणानुसार टँकरची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गिरणा नदीपात्रात ब्रिटिशकालीन बंधारे किंवा केटीवेअर बंधारे बांधण्यात आले तर पाणी अडविले जाईल व नदीला पाणी नसतानादेखील पाणीपुरवठा योजना सुरळीत राहतील यासाठी गिरणा नदीपात्रात केटीवेअर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उषाताई बच्छाव यांनी केली.गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या होत असलेल्या वाळू उपशाबाबत तहसीलदार श्रीमती भोसले यांच्याकडे तक्रार करूनही त्या कोणतीही दखल घेत नाहीत. यामुळे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार लोहोणेरच्या सरपंच सुलोचना शेवळे यांनी केली. चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता कालव्याच्या सुरुवातीस १८४.१९ क्युसेक्स इतकी असूनही कालव्याला १०० ते ११० क्युसेक्स इतकेच पाणी असल्याने देवळा तालुक्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही रामेश्वर धरण कालव्याद्वारे भरण्यास दोन आठवडे लागणे अपेक्षित असताना दीड महिना लागतो. सदोष कामाची चौकशी करण्याची मागणी विजय पगार यांनी केली असता या विषयाबाबत पाटबंधारे विभागाची स्वतंत्र बैठक आमदारांसोबत घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. देवळा येथील मुद्रांकविक्रेते मनमानी करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली अशा मुद्रांक विक्रेत्यांना निलंबित करण्याणे आदेश आमदार कोतवालांनी महसूल विभागाला दिले.तालुक्यात गारपीटग्रस्तांचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाल्याने उमराणे, तीसगाव, वऱ्हाळे येथील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. तालुका कृषी अधिकारी संजय गुंजाळ यांनी चिंचवेतील शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपण आणल्याचा आरोप केल्याने तणाव निर्माण झाला. तालुक्यात ४६ पदवीधरांची पदे मंजूर असून, १५ पदे भरण्यात आली असून, ३१ पदे रिक्त असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारीपारधी यांनी दिली. (वार्ताहर)