शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

समृद्धीबाधित शेतकºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:17 IST

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.समृद्धीबाधित दहा जिल्ह्यांतील ३३ तालुक्यांतील शेतकरी मुंबई येथे गुरुवारी (दि. १०) मोर्चा काढणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या दहा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नरला या निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, राज्य प्रतिनिधी सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून समृद्धीबाधित गावातील शेतकरी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता. समृद्धी महामार्ग रद्द करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी घातल्या होत्या. समृद्धी महामार्गासाठी विरोध असणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी ‘समृद्धी महामार्ग रद्द करा, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा’, अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले. त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. यावेळी राजू देसले यांच्यासह काही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अधिकारी शासनाची दिशाभूल करून शेतकºयांची फसवणूक करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी केला. पर्यायी मार्ग असताना शासन आडमुठे धोरण घेत असून, यामुळे बागायती क्षेत्रासह अनेक शेतकºयांच्या घरावर नांगर फिरणार असल्याने शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी अंबादास वाजे यांनी केली. शेतकºयांनी एकजूट दाखवून यापुढेही लढा सुरू ठेवावा, असे आवाहन वाजे यांनी केले. राधेश्याम मोपलवार यांनी शेतकºयांची फसवणूक केल्यामुळे शासनाने त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी तानाजी तुपे यांनी केली. सदर प्रकल्प म्हणजे हत्ती असून, तो पोसणे अवघड असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती शांताराम ढोकणे यांनी व्यक्त केले. या महामार्गातून बागायती क्षेत्र टाळावे व पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नामदेव आरोटे, भाऊसाहेब कराड, रत्ना पवार, विमल सातपुते, शीलाबाई पडवळ, रावसाहेब हारक, उत्तम हारक, ज्ञानेश्वर चव्हाणके, दशरथ तांबे, विष्णू सांगळे, रंगनाथ ढोली, पांडुरंग बोडके, विनोद पडवळ, ज्ञानेश्वर काळुंगे, आनंदा काळुंखे, संजय वाजे, दशरथ ढोली, योगेश तांबे, विलास आढाव, विजय दराडे, किरण हारक, संजय वाजे, नवनाथ ढोली, सोपान वाजे, अमोल वाजे, संतोष बर्वे, घमाजी ढोली यांच्यासह सोनांबे, शिवडे, पांढुर्ली, दुसंगवाडी, पाथरे, मलढोण, मºहळ, डुबेरे, पाटोळे आदिंसह समृद्धीबाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, दत्तात्रय कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.