शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीबाधित शेतकºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:17 IST

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास निदर्शने केली.समृद्धीबाधित दहा जिल्ह्यांतील ३३ तालुक्यांतील शेतकरी मुंबई येथे गुरुवारी (दि. १०) मोर्चा काढणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या दहा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नरला या निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, राज्य प्रतिनिधी सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून समृद्धीबाधित गावातील शेतकरी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता. समृद्धी महामार्ग रद्द करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी घातल्या होत्या. समृद्धी महामार्गासाठी विरोध असणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी ‘समृद्धी महामार्ग रद्द करा, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा’, अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले. त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. यावेळी राजू देसले यांच्यासह काही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अधिकारी शासनाची दिशाभूल करून शेतकºयांची फसवणूक करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी केला. पर्यायी मार्ग असताना शासन आडमुठे धोरण घेत असून, यामुळे बागायती क्षेत्रासह अनेक शेतकºयांच्या घरावर नांगर फिरणार असल्याने शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी अंबादास वाजे यांनी केली. शेतकºयांनी एकजूट दाखवून यापुढेही लढा सुरू ठेवावा, असे आवाहन वाजे यांनी केले. राधेश्याम मोपलवार यांनी शेतकºयांची फसवणूक केल्यामुळे शासनाने त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी तानाजी तुपे यांनी केली. सदर प्रकल्प म्हणजे हत्ती असून, तो पोसणे अवघड असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती शांताराम ढोकणे यांनी व्यक्त केले. या महामार्गातून बागायती क्षेत्र टाळावे व पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नामदेव आरोटे, भाऊसाहेब कराड, रत्ना पवार, विमल सातपुते, शीलाबाई पडवळ, रावसाहेब हारक, उत्तम हारक, ज्ञानेश्वर चव्हाणके, दशरथ तांबे, विष्णू सांगळे, रंगनाथ ढोली, पांडुरंग बोडके, विनोद पडवळ, ज्ञानेश्वर काळुंगे, आनंदा काळुंखे, संजय वाजे, दशरथ ढोली, योगेश तांबे, विलास आढाव, विजय दराडे, किरण हारक, संजय वाजे, नवनाथ ढोली, सोपान वाजे, अमोल वाजे, संतोष बर्वे, घमाजी ढोली यांच्यासह सोनांबे, शिवडे, पांढुर्ली, दुसंगवाडी, पाथरे, मलढोण, मºहळ, डुबेरे, पाटोळे आदिंसह समृद्धीबाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, दत्तात्रय कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.