शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:55 IST

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भारिप बहुजन महासंघाचा मालेगावी मेळावा

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस व भाजपाने देशातील सत्ता सर्वसामान्यांच्या हातात येवू दिली नाही. म्हणून लोकशाहीवर हल्ला केला जातो. लोकशाहीला कैद करण्याचा प्रकार सुरू आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. कारखाने, व्यवसाय बंद पडले. शासनाला मनुवाद अनायचा आहे. त्यामुळे सावधानतेने पाऊले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.कापड उद्योगाला सवलतीच्या दरात वीज पुरविणे गरजेचे आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या बेलगाम घोड्याला लगाम घालण्यासाठी व संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे जागा वाटपाचा आराखडा मागितला होता. मात्र त्यांनी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. शासनाने हमीभाव जाहीर केला; मात्र त्यासाठीच्या बाजारपेठा व यंत्रणेचा तपास नाही. मागचे सरकार सरळसरळ खात होते. आत्ताचे सरकार चोरांचे सरकार असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. यावेळी शांताराम बोरसे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर ढेपले, दिशा पिंकी शेख, अनिल जाधव, अमित भाईगळ, डॉ. खालीद परवेझ, मौलाना सुफी गुलाम रसूल, प्रा. किसन चव्हाण आदिंची भाषणे झाली. मेळाव्याची वेळ दुपारी ३ वाजेची ठेवण्यात आली होती. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची तब्बल तीन तास उशिराने सभास्थळी आगमन झाले. त्यानंतरही एक तास इतर वक्त्यांची भाषणबाजी झाली. कार्यकर्त्यांना व महिलांना आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी ताटकळत बसून रहावे लागले.