शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:55 IST

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भारिप बहुजन महासंघाचा मालेगावी मेळावा

मालेगाव : जातीयवादीयाकडून लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. सर्वसामान्यांच्या दारापर्यंत लोकशाही पोहोचली तरच संविधान व लोकशाहीला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकशाहीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर वंचित समाजाने एकत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस व भाजपाने देशातील सत्ता सर्वसामान्यांच्या हातात येवू दिली नाही. म्हणून लोकशाहीवर हल्ला केला जातो. लोकशाहीला कैद करण्याचा प्रकार सुरू आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. कारखाने, व्यवसाय बंद पडले. शासनाला मनुवाद अनायचा आहे. त्यामुळे सावधानतेने पाऊले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.कापड उद्योगाला सवलतीच्या दरात वीज पुरविणे गरजेचे आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या बेलगाम घोड्याला लगाम घालण्यासाठी व संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे जागा वाटपाचा आराखडा मागितला होता. मात्र त्यांनी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. शासनाने हमीभाव जाहीर केला; मात्र त्यासाठीच्या बाजारपेठा व यंत्रणेचा तपास नाही. मागचे सरकार सरळसरळ खात होते. आत्ताचे सरकार चोरांचे सरकार असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. यावेळी शांताराम बोरसे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर ढेपले, दिशा पिंकी शेख, अनिल जाधव, अमित भाईगळ, डॉ. खालीद परवेझ, मौलाना सुफी गुलाम रसूल, प्रा. किसन चव्हाण आदिंची भाषणे झाली. मेळाव्याची वेळ दुपारी ३ वाजेची ठेवण्यात आली होती. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची तब्बल तीन तास उशिराने सभास्थळी आगमन झाले. त्यानंतरही एक तास इतर वक्त्यांची भाषणबाजी झाली. कार्यकर्त्यांना व महिलांना आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी ताटकळत बसून रहावे लागले.