शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

देशातील लोकशाही धोक्यात : प्रणिती शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:08 IST

देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.एनएसयूआयच्या राज्य व नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, सदस्य अश्विनी अहेर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिन शेख, नगरसेवक वत्सला खैरे, राहुल दिवे, ममता पाटील आदी उपस्थित होते. प्रणिती शिंदे म्हणाल्या, समाजात सुसंवादाची गरज आहे. पंतप्रधानांच्या भाषणांपेक्षा दोन व्यक्ती, दोन गटांमध्ये होणारा संवाद महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांत हा सुसंवाद हरवला आहे. जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याने देशातील लोकशाही संकटात आली आहे. परंतु तरुणांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व देशाच्या अखंडत्वाला अडचणीत आणू पाहणाºयांविरोधात एकत्रित येऊन देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांना बरोबरीचे स्थान मिळण्याची गरज असून, याची शिकवण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरातूनच मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करिअर करण्याची संधी देऊन मुलांमध्ये आत्मविश्वासाची निमिर्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त के ली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत एनएसयूआयचे राज्य सचिव नितीन काकड यांनी, प्रास्ताविक आकाश छाजेड यांनी, तर सूत्रसंचालन लीना शेख यांनी केले.काँग्रेसमधील गट-तट पुन्हा चव्हाट्यावरनाशिक शहर व जिल्ह्यात मरगळ झटकण्याच्या निमित्ताने पक्षांतर्गत युवा ब्रिगेडकडून सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत एनएसयूआयतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातही पक्षांतर्गत असलेले गट-तट दिसून आले. माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्यासह आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे एकत्रितरीत्या सत्कार सोहळ्यात सहभागी झालेले असताना, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या गटाने मात्र या सत्कार सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेस