शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

साधू-महंतांच्या मागण्या मान्य

By admin | Updated: September 9, 2015 22:55 IST

साधू-महंतांच्या मागण्या मान्य

त्र्यंबकेश्वर : आखाड्यांनीच भाविकांची व रथाची संख्या कमी करण्याची सूचनात्र्यंबकेश्वर : प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या असल्या, तरी काही मागण्या अजून अपूर्णच आहे. असे आखाडा परिषदकडून सांगण्यात आले. शाहीस्नानाची वेळ वाढवून मिळावी, ही मागणी शेवटच्या क्षणी केल्याने ती पूर्ण करता येणे अशक्य आहे. यावर प्रशासन ठाम आहे. असे परिेषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले, तर आगामी शाही मिरवणुकीत आखाड्यांनी आपल्या भाविकांची व रथांची संख्या कमी करावी, असे प्रशासनाकडून महंतांना सांगण्यात आले. येथील नूतन तहसील कार्यालयात मंगळवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री महंत हरीगिरी महाराज, षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती, उपाध्यक्ष प्रेमागिरी, उमाशंकर भारती, महंत राजिंदर सिंहजी, महंत जगतारमुनीजी, महंत त्रिवेणीदास, प्रेमानंदजी आदि संत-महंत उपस्थित होते, तर प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळाअधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, बाळासाहेब शेवाळे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, राजेंद्र कांबळे आदि अधिकारी बैठकीस उपस्थित होते. आखाडा परिषदेने प्रशासनाकडे शाहीस्नानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी शेवटच्या क्षणी केल्याने ती मान्य करता येणार नाही असे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले. त्यातील त्रुटी, अडचणी महंतांना समजून सांगण्यात आल्या. (वार्ताहर)कुशावर्तावर मज्जाव केला जाणार नाही

शाही मिरवणुकीत आखाड्यांतर्फे आलेल्या भाविकांना-सांधूना कुशावर्तावर सोडण्यास मज्जाव केला जाणार नाही. सामान्य नागरिक व पोलिसांनाही कुशावर्तावर जाण्यास मज्जाव राहील. कुशावर्त चौकातून शाही मिरवणुकीतील साधूंना पोलीस आत सोडतील. घाटावरदेखील सक्ती केली जाणार नाही, असे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. २९ आॅगस्टच्या पर्वणीच्या वेळी कुशावर्तावर गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांनी साधंूना, भाविकांना घाटावर जबरदस्तीने स्नान करण्यास भाग पाडले तसेच साधू आणि महिलांनाही धक्काबुक्की केली. यावर साधू-महंत नाराज झाले होते.