शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चास येथे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:32 IST

नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चास गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चास गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भोजापूर धरण उशाशी असताना गावाचा घसा कोरडा पडला आहे. गावात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंच नंदाताई भाबड यांनी पंचायत स्तरावर केली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. गावापासून जाणाºया म्हाळुंगी नदीजवळ स्थानिक पाणीपुरवठा योजनेची विहिंर आहेत. त्यातूनच गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याने बागायती क्षेत्रात सुध्दा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षात भोजापूर खोºयात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. या भागात विहिरींनी तळ गाठल्याने अर्धातास सुध्दा विद्युतपंप चालत नाही. भोजापूर धरणाच्या क्षेत्रात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहिली नसल्याने पाणी पुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीत पाणी आल्यानतंर तीन ते चार दिवसांनी गावाला पंधरा ते वीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. चास गावात तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असल्याने सदरचा पाणीपुरवठा गावाला अपुरा पडत आहे. त्यामुळे पावसाचे माहेरघर असलेल्या भागात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nashikनाशिक