शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

पाणीसाठा तयार करण्याची मागणी

By admin | Updated: November 16, 2015 21:59 IST

पाणीसाठा तयार करण्याची मागणी

येवला : दुष्काळामुळे हरणांवर वणवण भटकण्याची वेळयेवला : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वन्यजीव हरणांसाठी कृत्रिम पाणी साठवण टँक तयार करण्याची मागणी येथील तहसीलदार शरद मंडलिक यांच्याकडे परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सध्या येवला तालुका दुष्काळाच्या गर्तेत सापडला असून, आगामी काही दिवसांत पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. सध्या परिसरातील हरणांसह अन्य वन्यप्राणी रस्त्यावर कळपाने पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत. हरणाच्या कळपाच्या मातुलठाण येथील कावेरी दाणे येथे झालेल्या अशाच अपघातात १५ वर्षीय विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले, तर एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे प्रशासनाने या घटना गांभीर्याने घेत परिसरात वन्यजिवांसाठी कृत्रिम पाण्याचे साठे तयार करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील राजापूरसह सर्वच क्षेत्रांत अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी रणजित संसारे, गोरख सुरासे, नितीन संसारे, बाळासाहेब वाल्हेकर, जितेश गायकवाड, दत्तात्रेय जमधडे, संजय पवार, ज्ञानेश्वर जमधडे, गंगाधर संसारे, सुधाकर वाल्हेकर आदिंसह ग्रामस्थांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. (वार्ताहर)