शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

दस्त वाचविण्यासाठी तलाठी कार्यालयाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST

तलाठ्यांकडील गावातील शेतीची माहिती सद्यस्थितीत पूर्णतः ऑनलाइन झालेली नाही. यामुळे या दस्ताचा आधार घेऊनच संबंधित तलाठी शेतकऱ्यांना ...

तलाठ्यांकडील गावातील शेतीची माहिती सद्यस्थितीत पूर्णतः ऑनलाइन झालेली नाही. यामुळे या दस्ताचा आधार घेऊनच संबंधित तलाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा, ड पत्रक, नोंदी आदी कागदपत्रे उपलब्ध करून देतो. मात्र, ही कागदपत्र ठेवण्यासाठीच जागा नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुठल्याही गावी तलाठी कार्यालय नसल्याने एखाद्या शाळेत एखाद्या पडीक घरी किंवा ग्रामपंचायतीची एखादी जुनी पडत असलेली इमारत, यामध्ये तलाठी कार्यालय आजपर्यंत चालविले जात आहे. स्वातंत्र्य उलटून पन्नास वर्षांच्या पुढील काळ लोटला गेला आहे, तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात कार्यालय अपूर्ण आहे. गावातील तलाठी कार्यालय ग्रामसेवक कार्यालय किंवा कृषी सहायक यांचे कार्यालय, तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून देण्यासाठी उपलब्ध असणारे कार्यालय या कार्यालयाची निर्मिती करून, ग्रामस्थांना वेगवेगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे ठरणार आहे. तलाठी कार्यालय दस्ताच्या दृष्टिकोनातून अतिशय सुविधा केंद्र म्हणून शेतकऱ्यांना उपयोगी होणार आहे. प्रत्येक गावातील रस्त्याचा नोंदणी ठेवण्यासाठी गावातून एक तलाठी सहायक कर्मचारी सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. तालुक्यात सद्यस्थितीत जास्त पावसाचे प्रमाण झाल्याने, तलाठी कार्यालयासाठी उपलब्ध असलेल्या असलेल्या इमारती यांना मोठी गळती लागली आहे. यामुळे तलाठी कार्यालयाचे दप्तर पाण्याने भिजण्याच्या मार्गावर आहे. सदर दप्तर ओले झाले, तर शेतकऱ्याची सगळी कुंडली गायब होणार आहे. यास्तव उत्तम प्रतीचे तलाठी कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

इन्फो

अद्ययावतीकरण आवश्यक

महसूल विभागाने कार्यालय ऑनलाइन केले असले, तरी अद्याप ड पत्रक नोंदी अद्यावतीकरण झालेले नाही. प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान आहे, तरीही त्यांना सहायकाची आवश्यकता होत असल्याने, त्या दृष्टीने प्रत्येक गावातून एक तलाठी सहायक जागेची निर्मिती केल्यास येणाऱ्या मदत होणार आहे. पीक पाहणी, पीक अनुदान, पीकविमा, आधीचे सर्वेक्षण करण्यासाठी कोतवालांची निर्मिती केली होती. मात्र, सदर कोतवाल ही अशिक्षित किंवा पूर्ण माहिती नसलेली किंवा तंत्रज्ञान माहिती नसलेले आहेत. यामुळे तलाठी सहायकाचीची निर्मिती करणे गरजेचे ठरले आहे. तलाठी कार्यालयातून शेतकऱ्यांना आवश्यक ती योजनांची माहिती, तसेच डिजिटल कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.