शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

दस्त वाचविण्यासाठी तलाठी कार्यालयाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST

तलाठ्यांकडील गावातील शेतीची माहिती सद्यस्थितीत पूर्णतः ऑनलाइन झालेली नाही. यामुळे या दस्ताचा आधार घेऊनच संबंधित तलाठी शेतकऱ्यांना ...

तलाठ्यांकडील गावातील शेतीची माहिती सद्यस्थितीत पूर्णतः ऑनलाइन झालेली नाही. यामुळे या दस्ताचा आधार घेऊनच संबंधित तलाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा, ड पत्रक, नोंदी आदी कागदपत्रे उपलब्ध करून देतो. मात्र, ही कागदपत्र ठेवण्यासाठीच जागा नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुठल्याही गावी तलाठी कार्यालय नसल्याने एखाद्या शाळेत एखाद्या पडीक घरी किंवा ग्रामपंचायतीची एखादी जुनी पडत असलेली इमारत, यामध्ये तलाठी कार्यालय आजपर्यंत चालविले जात आहे. स्वातंत्र्य उलटून पन्नास वर्षांच्या पुढील काळ लोटला गेला आहे, तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात कार्यालय अपूर्ण आहे. गावातील तलाठी कार्यालय ग्रामसेवक कार्यालय किंवा कृषी सहायक यांचे कार्यालय, तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून देण्यासाठी उपलब्ध असणारे कार्यालय या कार्यालयाची निर्मिती करून, ग्रामस्थांना वेगवेगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे ठरणार आहे. तलाठी कार्यालय दस्ताच्या दृष्टिकोनातून अतिशय सुविधा केंद्र म्हणून शेतकऱ्यांना उपयोगी होणार आहे. प्रत्येक गावातील रस्त्याचा नोंदणी ठेवण्यासाठी गावातून एक तलाठी सहायक कर्मचारी सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. तालुक्यात सद्यस्थितीत जास्त पावसाचे प्रमाण झाल्याने, तलाठी कार्यालयासाठी उपलब्ध असलेल्या असलेल्या इमारती यांना मोठी गळती लागली आहे. यामुळे तलाठी कार्यालयाचे दप्तर पाण्याने भिजण्याच्या मार्गावर आहे. सदर दप्तर ओले झाले, तर शेतकऱ्याची सगळी कुंडली गायब होणार आहे. यास्तव उत्तम प्रतीचे तलाठी कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

इन्फो

अद्ययावतीकरण आवश्यक

महसूल विभागाने कार्यालय ऑनलाइन केले असले, तरी अद्याप ड पत्रक नोंदी अद्यावतीकरण झालेले नाही. प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान आहे, तरीही त्यांना सहायकाची आवश्यकता होत असल्याने, त्या दृष्टीने प्रत्येक गावातून एक तलाठी सहायक जागेची निर्मिती केल्यास येणाऱ्या मदत होणार आहे. पीक पाहणी, पीक अनुदान, पीकविमा, आधीचे सर्वेक्षण करण्यासाठी कोतवालांची निर्मिती केली होती. मात्र, सदर कोतवाल ही अशिक्षित किंवा पूर्ण माहिती नसलेली किंवा तंत्रज्ञान माहिती नसलेले आहेत. यामुळे तलाठी सहायकाचीची निर्मिती करणे गरजेचे ठरले आहे. तलाठी कार्यालयातून शेतकऱ्यांना आवश्यक ती योजनांची माहिती, तसेच डिजिटल कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.