शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उसाच्या बांड्यांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:15 IST

येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे

मानोरी येथे थेट घरपोच आलेल्या उसाच्या बांड्या जनावरांना चारा म्हणून विकत घेताना शेतकरी.मानोरी : येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. येवला तालुक्यातील मुखेड, सत्यगाव, दत्तवाडी, नेऊरगाव, भिंगारे, मानोरी बुद्रुक परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन शेतकरी वर्गाने घेतले असून, मुबलक पाण्यामुळे उसाचा दर्जादेखील चांगल्या प्रमाणात सुधारला असून, सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने या उसाच्या बांड्यांना जनावरांना हिरवा चारा म्हणून शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.यंदा दुग्ध व्यवसायालादेखील अच्छे दिन आलेले असल्याने यंदा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू केले आहे. दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना वेळेवर चारा मिळत नव्हता. दोन वर्षांपासून दुधाला १८ ते २० रु पये प्रतिलिटर इतका दर मिळत होता. यातून दुधाचा उत्पादन खर्चदेखील फिटणे कठीण होऊन गेले होते. यंदा मात्र चारा मोठ्या प्रमाणात असून, उसाच्या हिरव्या बांड्यांमुळे दुधाला अच्छे दिन आले आहेत. त्यात ढेपीचेदेखील दर कमी झाले असल्याने सध्या दुधाला सरासरी ३४ रुपये प्रतिलिटर इतका उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे मुखेड येथे हिरव्यागार बांड्या घेण्यासाठी दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. मानोरी, खडकीमाळ, देशमाने, भिंगारे, सत्यगाव, वाकद, नेऊरगाव, शिरवाडे आदी गावांतील शेतकरी वर्ग आपल्या गायींना उसाच्या हिरव्या बांड्या घेण्यासाठी येत असतात. ऊसतोड कामगार दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ऊस तोडून उसाच्या ट्रक भरून दिल्यानंतर उसाच्या बांड्या विकण्यासाठी गावोगावी फिरत असतात. उसाच्या बांड्यांना सध्या शंभर रुपये शेकड्याप्रमाणे दर मिळत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र