शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

सिंहस्थासाठी भरीव निधीची तरतूद हवी : खासदार द्वयींची भूमिका

By admin | Updated: February 17, 2015 00:16 IST

ओझर विमानतळासह नाशिक -पुणे, नाशिक-सुरत, मनमाड-इंदोर रेल्वेलाही मिळावी गती

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपला असून, अद्यापही केंद्र स्तरावरून भरीव निधी उपलब्ध झालेला नाही. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात सिंहस्थांसाठी भरीव निधीची तरतूद ठेवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच देश-परदेशातून नाशिकला भाविक येणार असल्याने नाशिकची हवाई सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी भूमिका नाशिक व दिंडोरीच्या खासदार द्वयींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. काल (दि.१६) मुख्यमंत्र्यांनी स'ाद्री अतिथीगृहावर महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलविली होती. केंद्रीय अर्थ संकल्पाच्या आधी राज्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक व पाठपुरावा आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. त्यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले की, अवघ्या पाच-सहा महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून, अद्यापही केंद्र स्तरावरून सिंहस्थांसाठी आवयक निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ही तरतूद वेळेत झाली, तर भाविकांना वेळेत सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश येईल. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले असून, त्यालाही केंद्रास तत्त्व गती देण्याची गरज आहे. शीलापूर येथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब व सिन्नरत तालुक्यातील सावतामाळीनगर येथे कृषी महाविद्यालयास तत्त्वता मान्यता मिळाली असून, राज्य शासनाने त्यासाठी केंद्र स्तराकडे पाठपुरावा करून निधी मिळवावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तामिळनाडूतील नेमली येथील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार केलेल्या पावणे सहाशे कोटींच्या पाणी प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईसह राज्यात जेथे शक्य असेल त्या समुद्र किनारी समुद्राच्या अशा पाण्यापासून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून भरीव निधीच्या तरतुदीबाबत आग्रही भूमिका घ्यावी, असे सांगितले. त्याचप्रमाणे मनमाड-इंदोर रेल्वेमार्गासाठी आपण रेल्वेबजेटमध्ये वेळोवेळी भूमिका मांडली असून, राज्य शासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. तसेच नाशिक-पुणे, नाशिक सुरत रेल्वेमार्गासाठीही केंद्र शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना मांडली. (प्रतिनिधी) इन्फो.. ओल्या पार्ट्या थांबतील नाशिक विमानतळाचे हस्तांतर तत्काळ करून तेथून सिंहस्थापूर्वी विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे यांनी केली. हस्तांतर होत नसल्याने तेथे होत असलेल्या ओल्या पार्ट्या थांबतील, अशी उपरोधिक टीकाही खासदार चव्हाण यांनी केली.