शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्त्यांची खोदकामे थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:06 IST

इंटरनेटसेवेसाठी चांगले रस्ते खोदण्याच्या प्रकाराबद्दल शिवसेना आक्रमक झाली असून, चांगले रस्ते फोडणे तातडीने थांबवावे, अशी मागण आयुक्तांकडे केली आहे.

नाशिक : इंटरनेटसेवेसाठी चांगले रस्ते खोदण्याच्या प्रकाराबद्दल शिवसेना आक्रमक झाली असून, चांगले रस्ते फोडणे तातडीने थांबवावे, अशी मागण आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अशाप्रकारच्या परवानग्या दिल्या, परंतु रस्ते फोडल्यानंतर ते पुन्हा जैसे थे करून दिले जात नसल्याने हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.महापालिकेने शासनाच्या धोरणानुसार इंटरनेट सेवेसाठी भूमिगत केबल टाकण्याचे धोरण मंजूर केले आहे. परंतु त्यानंतर महापालिकेने शहरातील तीन ते पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले चांगले रस्ते फोडण्यास परवानगी दिली जात आहेत. जेहान सर्कल ते पाइपलाइनरोड परिसरात अशाच प्रकारे रस्ते फोडले जात असून, एकाच कंपनीने परवानगी घेऊन अन्य कंपन्यांच्या केबल घुसवण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिकेच्या या फसवणुकीबाबत लोकमतने वृत्त दिले होते. त्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले आहे. महापालिकेने यापूर्वीदेखील रस्ता फोडण्याच्या कामाचे शुल्क (डॅमेज चार्जेस) घेऊन कामे करण्यास परवानगी दिली आहे. परंतु काम झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा महापालिकेच्या वतीने रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा खालावला गेला आहे. तसेच रस्त्याचा खर्चदेखील वाया गेला आहे. ही बाब गंभीर असून नागरिकांचा कराचा पैसा वाया जात आहे. त्यामुळे यापुढे अशाप्रकारचे काम करायचे असेल तर कामास सुरुवात करण्यापूर्वीच संबंधित कंपन्यांना अथवा सरकारी उपक्रमांना कळवून रस्ते खोदकाम करून घ्यावे त्यांनतर रस्ता फोडू नये, त्याचप्रमाणे महापालिकेने रस्त्याच्या खाली स्वत: पाइप टाकून अशाप्रकारच्या सर्व्हीस केबल टाकण्याची सोय करून द्यावी तोपर्यंत रस्ते फोडू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीroad safetyरस्ते सुरक्षा