शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागा वाचविण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: May 10, 2015 23:57 IST

द्राक्षबागा वाचविण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकासाठी अनुकूल परिस्थिती असूनही सततच्या होत असलेल्या अवकाळी पाऊस व आपत्तीमुळे द्राक्ष बागाईतदारांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे द्राक्षबागांच्या बचावासाठी द्राक्षबागांच्या प्लास्टिक आच्छादनाकरिता सहाय्य करण्यासाठी नवीन योजना सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात २०१५ खरीप पूर्व हंगामाच्या बैठकीस आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.आमदार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, द्राक्ष पक्वतेच्या वेळी तपमानात झालेली घट, अति बाष्पाचे प्रमाण, तीव्र सूर्यप्रकाश आणि हवामानातील बदलामुळे द्राक्षबागेवर बरेचवेळा अनिष्ठ परिणाम होऊन द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. मात्र या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने त्यांच्या बागा वाचविण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाकरिता सहाय्य करण्यासाठी योजना सुरू करण्यात यावी. तसेच गेल्या वर्षात कांदा बि-बियाणे ६० टक्के खराब निघाल्याने शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने पुढील वर्षात ते बियाणे प्रमाणित करून मगच त्याचे वितरण करण्यात यावे निवेदनात म्हटले आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दुष्काळसदृश परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहे. त्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध नाही. तसेच तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील डाळिंबाच्या क्षेत्रात घट होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन २०१० पासून कृषिपंपाच्या विद्युत कनेक्शनसाठी अनामत रक्कम भरल्या असताना त्यांना आजतागायत वीज कनेक्शन देण्यात आले नसल्याचे त्यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.