शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:17 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. अनेकांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने परिसरातील गावे-वाड्या-पाड्यांमध्ये मनरेगाची तसेच जलसंधारणांची कामे हाती घ्यावीत आणि मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.दरवर्षी मजुरांचे स्थलांतर हे केवळ तालुक्यात कामे नसल्या मुळेच होत असते. दिवाळी नंतर हे स्थलांतर होउन साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हे स्थलांतरित मजूर दोन पैसे गाठीला घेऊनच परत येत असतात. याच पैशातून खरीप लागवडीचा प्रश्न सुटत असतो. पण यावर्षी कोरोनामुळे स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनलाच शिवाय, जवळ एकही पैसा नसताना उपाशी तापाशी आपली कच्चीबच्ची खांद्यावर घेउन पायी परत माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. मुंबई, गुजरात, ठाणे, कल्याण आदी भागातून त्र्यंबक तालुक्यातील स्थलांतरित मजूर आपल्या गावी परतले आहेत. गावातही कामे नसल्याने त्यांच्यावर हाताला घडी बांधून बसण्याची वेळ ओढवली आहे.---------------------------------तालुक्यातील गावे, वाड्या-पाडे येथील जलसंधारणेची कामे (उदा.) विहिरी, गावतलाव, शेतीचे बांधबंदिस्ती, खड्डे खोदणे, कच्चे रस्ते तयार करणे, रस्त्यालगत गटार खोदणे या कामांना सुरुवात करावी. पाण्याचा स्रोत शोधून विहीर खोदकाम करणे, शेततळे ही कामे प्राधान्यने सुरू केल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या संबंधी निवेदन तहसीलदारांना दिले आहे. त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा.- रघुनाथ घाटाळ, सदस्य, ग्रामपंचायत, मुलवड

टॅग्स :Nashikनाशिक