शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:58 IST

सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने गावाचा विकासही खुंटला आहे.

ठळक मुद्देकोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल.

सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने गावाचा विकासही खुंटला आहे. शासनाने कोळीपाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी कोळीपाडा व दोधेश्वर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.कोळीपाडा ग्रामस्थांनी ग्रामसभेत या विषयासंदर्भात ठराव केलेला आहे. ग्रामस्थांनी आज बागलाणचे तहसिलदार प्रमोद हिले व गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ठरावाची प्रत व निवेदन दिले. निवेदनात, १९६७ मध्ये कोळीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत अमरावतीपाडा, कोळीपाडा व दोधेश्वर या तीन गावांची एकित्रत ग्रुप ग्रामपंचायत आहे. कोळीपाड्याची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. कोळीपाडा व दोधेश्वर गावातील शंभर टक्के ग्रामस्थ कोळी महादेव व भिल्ल या अनुसूचीत जमातीचे आहेत. मात्र कोळीपाडा हे गाव महसुली नसल्याने कोणतेही आॅनलाईन काम करता येत नाही. शासनाच्या धोरणानुसार शैक्षणकि व नोकरीसाठी अर्ज दाखल भरताना आॅनलाईन लोकेशनला कोळीपाडा गाव येत नाही. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांना सातबारे उतारे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळत नाहीत. नोकरीसाठी अर्ज भरता येत नसल्याने गावातील अनेक होतकरू सुशिक्षति तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विकास करणेही जिकरीचे झाले आहे. कोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल. याबाबत तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच सखाराम जाधव, उपसरपंच भाऊसाहेब पानसे, ग्रामसेवक नीता देवरे, अर्जुन गातवे, पंडित गातवे, खुशाल गातवे, राधेशाम घोडे,नानाजी गातवे, भारत गातवे, शिवाजी जाधव, बापू येडे, आण्णा घुटे, रतन जाधव, पंकज भांगे, भिका भांगे, शांताराम भोईर, बाळू येडे, अंकुश लव्हारे,संतोष गातवे, विठोबा गातवे, भगवान भांगे, संदीप अिहरे, रोशन भांगे, बाळू सोनवणे, मोहन सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.