शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:58 IST

सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने गावाचा विकासही खुंटला आहे.

ठळक मुद्देकोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल.

सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने गावाचा विकासही खुंटला आहे. शासनाने कोळीपाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी कोळीपाडा व दोधेश्वर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.कोळीपाडा ग्रामस्थांनी ग्रामसभेत या विषयासंदर्भात ठराव केलेला आहे. ग्रामस्थांनी आज बागलाणचे तहसिलदार प्रमोद हिले व गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ठरावाची प्रत व निवेदन दिले. निवेदनात, १९६७ मध्ये कोळीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत अमरावतीपाडा, कोळीपाडा व दोधेश्वर या तीन गावांची एकित्रत ग्रुप ग्रामपंचायत आहे. कोळीपाड्याची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. कोळीपाडा व दोधेश्वर गावातील शंभर टक्के ग्रामस्थ कोळी महादेव व भिल्ल या अनुसूचीत जमातीचे आहेत. मात्र कोळीपाडा हे गाव महसुली नसल्याने कोणतेही आॅनलाईन काम करता येत नाही. शासनाच्या धोरणानुसार शैक्षणकि व नोकरीसाठी अर्ज दाखल भरताना आॅनलाईन लोकेशनला कोळीपाडा गाव येत नाही. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांना सातबारे उतारे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळत नाहीत. नोकरीसाठी अर्ज भरता येत नसल्याने गावातील अनेक होतकरू सुशिक्षति तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विकास करणेही जिकरीचे झाले आहे. कोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल. याबाबत तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच सखाराम जाधव, उपसरपंच भाऊसाहेब पानसे, ग्रामसेवक नीता देवरे, अर्जुन गातवे, पंडित गातवे, खुशाल गातवे, राधेशाम घोडे,नानाजी गातवे, भारत गातवे, शिवाजी जाधव, बापू येडे, आण्णा घुटे, रतन जाधव, पंकज भांगे, भिका भांगे, शांताराम भोईर, बाळू येडे, अंकुश लव्हारे,संतोष गातवे, विठोबा गातवे, भगवान भांगे, संदीप अिहरे, रोशन भांगे, बाळू सोनवणे, मोहन सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.