शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कॉलनी रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:48 IST

देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीत नगरपंचायतीने भुयारी गटारींचे काम पूर्ण केल्यानंतर गटारीसाठी खोदकाम केलेल्या कॉलनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केलेली नाही, त्यातच ह्या कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रहिवासी त्रस्त झाले असून ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी व कॉलनी रस्त्याने सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देधूळ व ध्वनिप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास

देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीत नगरपंचायतीने भुयारी गटारींचे काम पूर्ण केल्यानंतर गटारीसाठी खोदकाम केलेल्या कॉलनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केलेली नाही, त्यातच ह्या कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रहिवासी त्रस्त झाले असून ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी व कॉलनी रस्त्याने सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र. १६ मध्ये वाजगाव व कळवण ह्या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी रामराव हौ. सोसायटी ही कॉलनी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, रामेश्वर, कनकापूर, कांचणे, मुलुखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा, तसेच देवळा शहराच्या पश्चिम भागातील शेतकरी आपला कांदा लिलावासाठी देवळा येथे कळवण रस्त्यावर असलेल्या नवीन बाजार समिती आवारात घेऊन येतात. ह्या कॉलनीपासून १०० मीटरवर असलेल्या देवळा शहराकडील मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने शेतकरी घेउन जातात. यामुळे दिवसभर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. नुकतेच भुयारी गटारीसाठी झालेल्या रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही.यामुळे जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. घरांमध्ये मोठ्या प्रमाणात ही धूळ येते. ही धूळ घरातील वस्तूंवर बसते. यामुळे महिलावर्गदेखील त्रस्त झाला आहे. धूळ व ध्वनिप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. ह्या कॉलनी रस्त्याची दुरूस्ती करण्यात येऊन येथून सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.गतवर्षी देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना कॉलनी रस्त्याने होणारी अवजड वाहतूक बंद करावी, अशा मागणीचे निवेदन कॉलनीतील रहिवाशांनी दिले होते. त्यावेळी कॉलनीच्या दोन्ही बाजूंना कळवण व वाजगाव रस्त्यावर ह्यअवजड वाहनांना प्रवेश बंदह्ण असे फलक लावण्याचे आश्वासन नगरपंचायतीने दिले होते; परंतु नंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी