शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रात सिंचनाचे आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 17:40 IST

सिन्नर : तालुक्याच्या भोजापूर धरणातून दोडी बुद्रुक, दोडी खुर्द व नांदूरशिंगोटे आदी गावांमध्ये लाभक्षेत्रात सिंचनासाठी आवर्तन द्यावे, अशी मागणी भोजापूर डाव्या कालव्यावरील पाणीवापर संस्थेतर्फे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या भोजापूर धरणातून दोडी बुद्रुक, दोडी खुर्द व नांदूरशिंगोटे आदी गावांमध्ये लाभक्षेत्रात सिंचनासाठी आवर्तन द्यावे, अशी मागणी भोजापूर डाव्या कालव्यावरील पाणीवापर संस्थेतर्फे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्याी, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर तातडीने आवर्तन सोडले जाईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाने दिले.भोजापूर धरण यावर्षी आॅगस्ट १०० टक्के भरले होते. त्यातून खरिप आवर्तन सोडल्यानंतर पावसाने दडी मारल्याने धरण पुन्हा भरले नाही. तसेच धरणातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. दोडी, नांदूरशिंगोटे परिसरात पाऊस झाल्याने त्यावर शेतकºयांनी हरबरा व ज्वारीची पेरणी केली आहे. तसेच लाभ क्षेत्रात दोनशे हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत. या पिकांसाठी सिंचनाचे आवर्तन देण्याची मागणीही करण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय अभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरणातील सध्याचा साठा व सिंचनासाठी उपलब्ध साठा याची माहिती देत बिगर सिंचनाच्या आरक्षणावितिरीक्त सर्व पाणी सिंचनासाठी देण्याबाबत कालवा सल्लागार समितीकडे प्रास्तावित केले जाईल, असे सांगितले. कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर तातडीने आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष कारभारी आव्हाड, कारभारी शिंदे, भागवत घुगे, शरद केदार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी