शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:37 IST

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निम्मा पावसाळा होऊन गेला तरी नदीनाले अध्याप कोरडे ठाक

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.या परिसरात असलेली नद्या-नाले, ओहळ, विहिरी कोरडे ठाक पडले आहे, त्यामुळे या परिसराला जीवनदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री व दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे भेंडाळीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कमानकर, ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल यांच्यासह निवेदन दिले आहे.कडवा कॅनॉलच्या लाभार्थी क्षेत्रात सद्या खरीप पिके धोक्यात आली आहे. पिके कोमेजून जात आहेत. शेतकऱ्यांनी हजारो रुपये भांडवल खर्च करुन शेतात पिके उभी केली आहे, मात्र आज कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. कर्ज काढून शेतकऱ्यांनी भांडवल उभे केले ते पूर्ण पिकांसाठी खर्च केले, आज मात्र डोळ्यासमोर पिके करपू लागली आहेत. भविष्यात पाऊस होईल की नाही हि शंका आहे, त्यामुळे रब्बीची शाश्वती नाही. आत्ता केवळ खरीप पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे, मात्र ती सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.धरण क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. धरण जवळपास ऐंशी टक्के भरले आहे. पिण्याच्या पाण्याचा आरक्षित कोठा तसाच ठेऊन उर्वरित पाणी सोडावे अशी मागणी मेलद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.त्यामुळे खरीपाचे पिक वाचविण्याकरीता कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल, सोमनाथ खालकर, गणेश शिंदे, जयवंत सातपुते, संतोष खालकर, मधुकर आढाव, बाळासाहेब खालकर, शशिकांत खालकर, कांतीलाल खालकर, संदीप सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते, दिपक शिंदे, बबन कमानकर, शरद शिंदे, विलास शिंदे, छगन शिंदे, रवींद्र शिंदे , सागर खालकर, गोकुळ खालकर, संतोष कमानकर, बबन शिंदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातagricultureशेती