शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:37 IST

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निम्मा पावसाळा होऊन गेला तरी नदीनाले अध्याप कोरडे ठाक

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.या परिसरात असलेली नद्या-नाले, ओहळ, विहिरी कोरडे ठाक पडले आहे, त्यामुळे या परिसराला जीवनदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री व दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे भेंडाळीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कमानकर, ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल यांच्यासह निवेदन दिले आहे.कडवा कॅनॉलच्या लाभार्थी क्षेत्रात सद्या खरीप पिके धोक्यात आली आहे. पिके कोमेजून जात आहेत. शेतकऱ्यांनी हजारो रुपये भांडवल खर्च करुन शेतात पिके उभी केली आहे, मात्र आज कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. कर्ज काढून शेतकऱ्यांनी भांडवल उभे केले ते पूर्ण पिकांसाठी खर्च केले, आज मात्र डोळ्यासमोर पिके करपू लागली आहेत. भविष्यात पाऊस होईल की नाही हि शंका आहे, त्यामुळे रब्बीची शाश्वती नाही. आत्ता केवळ खरीप पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे, मात्र ती सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.धरण क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. धरण जवळपास ऐंशी टक्के भरले आहे. पिण्याच्या पाण्याचा आरक्षित कोठा तसाच ठेऊन उर्वरित पाणी सोडावे अशी मागणी मेलद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.त्यामुळे खरीपाचे पिक वाचविण्याकरीता कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल, सोमनाथ खालकर, गणेश शिंदे, जयवंत सातपुते, संतोष खालकर, मधुकर आढाव, बाळासाहेब खालकर, शशिकांत खालकर, कांतीलाल खालकर, संदीप सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते, दिपक शिंदे, बबन कमानकर, शरद शिंदे, विलास शिंदे, छगन शिंदे, रवींद्र शिंदे , सागर खालकर, गोकुळ खालकर, संतोष कमानकर, बबन शिंदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातagricultureशेती