शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

ग्रामीण भागात जांभूळ फळाला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:17 IST

ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते.

ठळक मुद्देवातावरणातील बदलाचा फटका : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर वाढले

लखमापूर : ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते.यंदा फळांचा राजा आंबा या फळाला चांगली मागणी होती; परंतु कोरोनामुळे आंब्याची चव आंबट झाली. त्यामुळे आंबा हंगामाचा आता जवळ जवळ शेवट होत असताना, ग्राहक वर्गातून पौष्टिक असलेल्या जांभूळ फळाला मागणी आहे. पावसाळा सुरू झाला की जांभळांना बहर येतो; परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे बहर कमी आल्यामुळे फळाची आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. आयुर्वेदामध्ये जांभळाला महत्त्वाचे स्थान आहे. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. तसेच पावसाळी वातावरणात ते खाणे उत्तम मानले जाते.

२० किलोच्या जाळीचा ९०० रुपयांचा दरदरवर्षी जांभूळ फळ मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येते; परंतु यंदा हवामानातील बदल तसेच कोरोनामुळे बंद असल्यामुळे फळाची आवक कमी झालेली दिसून येत आहे. गतवर्षी जांभळाची २० किलोची जाळी साधारणपणे ५०० ते ६०० रु पयांपर्यंत विकली गेली यंदा मात्र ७०० ते ९०० रु पये मोजावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आम्ही दरवर्षी भरपूर प्रमाणात जांभूळ फळपीक घेतो. परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे झाडाला फळधारणा कमी आहे. यामुळे फक्त २० ते ३० टक्केच फळ हाताशी आले आहे. त्यामुळे शेतीसाठी मिळणारे भांडवलही पुरेशा प्रमाणात मिळू शकले नाही.- कोंडाजी पिंगळे, जांभूळ उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी