शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे पंचनामे, सरसकट पिककर्ज माफीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:01 IST

जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा पिकले तेव्हा तुम्ही लुटले अन आता तुमचे आमचे मिटले असे सांगून कर्ज भरणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : धुळगाव येथे सरकार विरोधात शेतकऱ्यांची एल्गार परिषद

जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा पिकले तेव्हा तुम्ही लुटले अन आता तुमचे आमचे मिटले असे सांगून कर्ज भरणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत सांगितले.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला कोणी येणार नाही ते शेतकºयांना स्वत:ला सोडवावा लागेल. बँकांनी वसूली करीता नोटीसा तयार केलेल्या आहेत, जमिनीची जप्ती झाल्यास आपला उतार्यातुन हक्क सोडावा लागेल, आज एक शेतकºयाचा लिलाव होईल उद्या आपली वेळ येईल, विजबिले न भरल्यास रोहित्र मिळत नाही. सहा महिन्यांपासून कृषी पंप बंद आहे, विजबिले कशाचे मागता? जगाच्या पोशिंद्याला शासनाने वाचविले पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी परिषदेचे आयोजक प्रा. शिवाजी भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, प्रहारचे हरिभाऊ महाजन, एकनाथ गायकवाड, राजेन्द्र गायकवाड आदिंसह धुळगाव येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते.मागील वर्षी दुष्काळ आण िचालु हंगामात परतीच्या पावसाने उभी पिके सडली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला आर्थिक सक्षम करावे लागेल याकरिता येथील हनुमान मंदिरात आजची सभा बोलविली होती.यावेळी प्रा. शिवाजी भालेराव व संजय सोमासे म्हणाले कि निवडणुका संपल्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे. मात्र राज्यातल्या शेतकºयांच्या गळ्याभोवती अस्मानी-सुलतानी संकटांचा फास आवळला जात आहे. सेना भाजपा सरकारची फसवी कर्जमाफी, मागील वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेला शेतकरी, ३ वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही.जिल्हा बँकेचे ठप्प झालेले व्यवहार यामुळे शेतकरी उद्वस्त झाला आहे. परतँच्या पावसाने हातातोंडाशी आलेले कपाशी, मका, सोयाबिन, लाल कांदा आदी पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन हंगामात शेतकºयांनी सोने तारण ठेवून पिके उभी केली. मात्र गेल्या वर्षीचा कोरडा आण ियंदाचा ओला दुष्काळाने शेतकरी देशोधडीला लागला. तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याचे भालेराव व सोमासे म्हणाले.(फोटो 0३ धुळगाव)येवला तालुक्यातील धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत संबोधित करताना संतु पाटील झांबरे, व उपस्थित ग्रामस्थ.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा