शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे पंचनामे, सरसकट पिककर्ज माफीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:01 IST

जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा पिकले तेव्हा तुम्ही लुटले अन आता तुमचे आमचे मिटले असे सांगून कर्ज भरणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : धुळगाव येथे सरकार विरोधात शेतकऱ्यांची एल्गार परिषद

जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा पिकले तेव्हा तुम्ही लुटले अन आता तुमचे आमचे मिटले असे सांगून कर्ज भरणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत सांगितले.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला कोणी येणार नाही ते शेतकºयांना स्वत:ला सोडवावा लागेल. बँकांनी वसूली करीता नोटीसा तयार केलेल्या आहेत, जमिनीची जप्ती झाल्यास आपला उतार्यातुन हक्क सोडावा लागेल, आज एक शेतकºयाचा लिलाव होईल उद्या आपली वेळ येईल, विजबिले न भरल्यास रोहित्र मिळत नाही. सहा महिन्यांपासून कृषी पंप बंद आहे, विजबिले कशाचे मागता? जगाच्या पोशिंद्याला शासनाने वाचविले पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी परिषदेचे आयोजक प्रा. शिवाजी भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, प्रहारचे हरिभाऊ महाजन, एकनाथ गायकवाड, राजेन्द्र गायकवाड आदिंसह धुळगाव येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते.मागील वर्षी दुष्काळ आण िचालु हंगामात परतीच्या पावसाने उभी पिके सडली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला आर्थिक सक्षम करावे लागेल याकरिता येथील हनुमान मंदिरात आजची सभा बोलविली होती.यावेळी प्रा. शिवाजी भालेराव व संजय सोमासे म्हणाले कि निवडणुका संपल्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे. मात्र राज्यातल्या शेतकºयांच्या गळ्याभोवती अस्मानी-सुलतानी संकटांचा फास आवळला जात आहे. सेना भाजपा सरकारची फसवी कर्जमाफी, मागील वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेला शेतकरी, ३ वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही.जिल्हा बँकेचे ठप्प झालेले व्यवहार यामुळे शेतकरी उद्वस्त झाला आहे. परतँच्या पावसाने हातातोंडाशी आलेले कपाशी, मका, सोयाबिन, लाल कांदा आदी पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन हंगामात शेतकºयांनी सोने तारण ठेवून पिके उभी केली. मात्र गेल्या वर्षीचा कोरडा आण ियंदाचा ओला दुष्काळाने शेतकरी देशोधडीला लागला. तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याचे भालेराव व सोमासे म्हणाले.(फोटो 0३ धुळगाव)येवला तालुक्यातील धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत संबोधित करताना संतु पाटील झांबरे, व उपस्थित ग्रामस्थ.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा