शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निसाका सहभागी तत्त्वावर चालवण्यास देण्याची मागणी टाळाटाळ : कोकणगाव येथे कामगार रस्ता रोको करणार

By admin | Updated: February 7, 2015 01:45 IST

निसाका सहभागी तत्त्वावर चालवण्यास देण्याची मागणी टाळाटाळ : कोकणगाव येथे कामगार रस्ता रोको करणार

  भाऊसाहेबनगर : दोन वर्षांपासून बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना सहभागी तत्त्वावर चालविण्यास देण्याच्या प्रक्रियेस राजकीय हस्तक्षेपामुळे शासकीय अधिकारी टाळाटाळ करत आहेत. याच्या निषेधार्थ निसाकाचे कामगार मंगळवारी (दि. १०) कोकणगाव येथे रस्ता रोको करणार आहेत. कारखान्यावर नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळातील शासकीय प्रतिनिधी पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ करतात. याच्या निषेधार्थ व निसाका सहभागी तत्त्वावर चालवण्यास देण्याची प्रक्रिया त्वरित करावी यासाठी निफाड सहकारी साखर कारखान्याचे कामगार बायकामुलांसह कोकणगाव फाट्यावर सकाळी १० वाजेपासून रस्ता रोको करून मुंबई-आग्रा महामार्ग बंद पाडतील, असा इशारा निफाड साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास आंधळे यांनी दिला आहे. दोन हंगामापासून बंद पडलेला कारखाना, कामगारांचे २८ महिन्यांपासून थकलेले पगार, कामगार वसाहतीचा खंडित झालेला वीज व पाणीपुरवठा याबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या निसाका कामगारांच्या द्वारसभेत अ‍ॅड. आंधळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वेळ पडल्यास कामगार पिंपळस (रामाचे) येथे सुद्धा नाशिक औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको करतील. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास दुसऱ्या दिवसापासून दररोज पाच कामगार आत्मदहन करतील असाही इशारा त्यांनी दिला. याप्रश्नी निवेदन देण्यासाठी व परिस्थितीचे गांभीर्य अवगत करण्यासाठी निसाका कामगारांचे शिष्टमंडळ आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ९) जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेणार आहे. त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधींना प्राधिकृत अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यास अडचण नाही. परंतु निरनिराळी कारणे पुढे करून प्रादेशिक सहसंचालक राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणी निर्माण करीत आहे. कारखाना बंद पडल्यामुळे ऊस उत्पादकांची अवस्था वाईट आहे. कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय असून कामगारांच्या बायकामुलांना पोट भरण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे. परंतु तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांची वाट लावणाऱ्या पुढाऱ्यांना याची खंत नाही अशी टीका त्यांनी केली. जिल्ह्यातील सर्व साखर कामगार या लढ्यात उतरणार असून निसाका कामगारांनी एकजुटीने लढ्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले.