शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

महापालिकेकडून मागणी : ९५ सुरक्षारक्षकांना केले कार्यमुक्त गोदापात्राची सुरक्षा आता पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:57 IST

नाशिक : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी पात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी मागील वर्षी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या ९५ सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना कार्यमुक्त केले आहे.

ठळक मुद्दे पत्रव्यवहारही महापालिकेने पोलीस आयुक्तालयाकडे केलापात्रात कुणी निर्माल्य अथवा घाण-कचरा टाकू नये

नाशिक : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी पात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी मागील वर्षी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या ९५ सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना कार्यमुक्त केले आहे. आता यापुढे न्यायालयाच्याच निर्देशानुसार, गोदापात्राची सुरक्षा पोलिसांच्या हाती सोपविण्यात येणार असून, त्यासंदर्भातील पत्रव्यवहारही महापालिकेने पोलीस आयुक्तालयाकडे केला आहे.गोदावरी नदी प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे. या याचिकेनुसार, उच्च न्यायालयाने गोदावरी नदीतील प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेला उपाययोजनेचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे एक वर्षापूर्वी महापालिकेने नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामार्फत रामकुंड ते तपोवन या दरम्यानच्या नदीपात्राची सुरक्षा करण्यासाठी, पात्रात कुणी निर्माल्य अथवा घाण-कचरा टाकू नये याकरीता कंत्राटी पद्धतीने ९५ सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली होती. तीन सत्रात सदर सुरक्षा रक्षक गोदाघाटावर कार्यरत होते. याशिवाय, संबंधितांकडून गोदापात्रात प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही केली जात होती. दरम्यान, ३१ मे रोजी गुरुवारी या सर्व सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. आता उच्च न्यायालयाच्याच निर्देशानुसार, गोदापात्रात प्रदूषण होणार नाही, याची दक्षता पोलिसांना घ्यायची असून त्याकरीता १९ कि.मी. लांबीच्या गोदापात्राच्या सुरक्षेसाठी ३० पोलीस कॉन्स्टेबल आणि चार पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करणारे पत्र महापालिकेने पोलीस आयुक्तालयाला पाठविले आहे. अद्याप त्यावर पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. सद्य:स्थितीत नाशिक महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्याच विविध कारणांवरून सुप्त संघर्ष सुरू असून, महापालिकेच्या मागणीला पोलीस आयुक्तालयाकडून तत्काळ प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.