शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 21:28 IST

येवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : केंद्र व राज्य शासनाकडे पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना, बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. मागील वर्षीचा खरीप हंगाम दुष्काळात गेला. रब्बी हंगाम अतिवृष्टीत सापडला व पुढे कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे शेतकºयांकडे फारसे उत्पादन तयार झाले नाही व जे झाले ते विकले जात नाही. शेतकºयांकडे पुढील पिकाचे बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी कर्जासाठी बँकेत गेले असता त्यांना मागील थकबाकी दाखवून कर्ज नाकारले जात आहे. काही बँकांमध्ये, ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना नेहमी दिले जाणाºया कर्जाच्या पन्नास टक्केच कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज घेण्यासाठी शेतकºयाला पुन्हा सातबारा, आठ अ, फेरफार, गहाणखत अशा अनेक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे कार्यालये बंद आहेत. आवश्यक उतारे मिळणे अशक्य आहे. तलाठी जागेवर सापडत नाहीत, बाहेर पडायला परवानगी नाही व उतारे दाखले मिळविण्यासाठी पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आॅनलाइन उपलब्ध आहेत मग शेतकºयांकडून कागदपत्रांचा आग्रह कशासाठी? बँकांनी आॅनलाइन शहानिशा करून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सदर निवेदनात म्हटले आहे.बागाइत भागात १० ते २० लाख रुपये एकर जमिनीची किंमत असली तरी कर्ज मिळण्याची कमाल मर्यादा फक्त ५० हजारच आहे. जिराईती भागात तर फारच कमी कर्ज पुरवठा होतो. किरकोळ रकमेसाठी मोठे क्षेत्र अडकून पडते व एक लाख रु पयांसाठी पन्नास लाख रुपयाच्या जमिनीचा लिलाव होतो. शेतकºयांना किमान सरकारने निर्धारित केलेल्या सरकारी व्हॅल्युएशनप्रमाणे रेडीरेकनरच्या किमतीइतके तरी एकरी कर्ज देण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील लिड बँकेचे अध्यक्ष व जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.मालमत्तेच्या तुलनेत तुटपुंजे कर्जदेशातील उद्योगपतींचे ६८ हजार कोटींचे कर्ज केंद्र सरकारने राइट- आॅफ केले आहे. हे माफ केले नाही फक्त सध्या हिशेबातून बाजूला ठेवले आहे. त्याच धरतीवर शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करु न तातडीने नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. शेतकºयाच्या तारण मालमत्तेच्या तुलनेत त्याला अतिशय तुटपुंजे कर्ज दिले जाते. त्यामुळे त्याला पुरेसा कर्जपुरवठा होत नाही.

टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरी