शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 21:28 IST

येवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : केंद्र व राज्य शासनाकडे पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना, बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. मागील वर्षीचा खरीप हंगाम दुष्काळात गेला. रब्बी हंगाम अतिवृष्टीत सापडला व पुढे कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे शेतकºयांकडे फारसे उत्पादन तयार झाले नाही व जे झाले ते विकले जात नाही. शेतकºयांकडे पुढील पिकाचे बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी कर्जासाठी बँकेत गेले असता त्यांना मागील थकबाकी दाखवून कर्ज नाकारले जात आहे. काही बँकांमध्ये, ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना नेहमी दिले जाणाºया कर्जाच्या पन्नास टक्केच कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज घेण्यासाठी शेतकºयाला पुन्हा सातबारा, आठ अ, फेरफार, गहाणखत अशा अनेक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे कार्यालये बंद आहेत. आवश्यक उतारे मिळणे अशक्य आहे. तलाठी जागेवर सापडत नाहीत, बाहेर पडायला परवानगी नाही व उतारे दाखले मिळविण्यासाठी पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आॅनलाइन उपलब्ध आहेत मग शेतकºयांकडून कागदपत्रांचा आग्रह कशासाठी? बँकांनी आॅनलाइन शहानिशा करून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सदर निवेदनात म्हटले आहे.बागाइत भागात १० ते २० लाख रुपये एकर जमिनीची किंमत असली तरी कर्ज मिळण्याची कमाल मर्यादा फक्त ५० हजारच आहे. जिराईती भागात तर फारच कमी कर्ज पुरवठा होतो. किरकोळ रकमेसाठी मोठे क्षेत्र अडकून पडते व एक लाख रु पयांसाठी पन्नास लाख रुपयाच्या जमिनीचा लिलाव होतो. शेतकºयांना किमान सरकारने निर्धारित केलेल्या सरकारी व्हॅल्युएशनप्रमाणे रेडीरेकनरच्या किमतीइतके तरी एकरी कर्ज देण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील लिड बँकेचे अध्यक्ष व जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.मालमत्तेच्या तुलनेत तुटपुंजे कर्जदेशातील उद्योगपतींचे ६८ हजार कोटींचे कर्ज केंद्र सरकारने राइट- आॅफ केले आहे. हे माफ केले नाही फक्त सध्या हिशेबातून बाजूला ठेवले आहे. त्याच धरतीवर शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करु न तातडीने नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. शेतकºयाच्या तारण मालमत्तेच्या तुलनेत त्याला अतिशय तुटपुंजे कर्ज दिले जाते. त्यामुळे त्याला पुरेसा कर्जपुरवठा होत नाही.

टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरी