शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 21:28 IST

येवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : केंद्र व राज्य शासनाकडे पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उद्योगपतीं- सारखे शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना, बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. मागील वर्षीचा खरीप हंगाम दुष्काळात गेला. रब्बी हंगाम अतिवृष्टीत सापडला व पुढे कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे शेतकºयांकडे फारसे उत्पादन तयार झाले नाही व जे झाले ते विकले जात नाही. शेतकºयांकडे पुढील पिकाचे बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी कर्जासाठी बँकेत गेले असता त्यांना मागील थकबाकी दाखवून कर्ज नाकारले जात आहे. काही बँकांमध्ये, ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना नेहमी दिले जाणाºया कर्जाच्या पन्नास टक्केच कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज घेण्यासाठी शेतकºयाला पुन्हा सातबारा, आठ अ, फेरफार, गहाणखत अशा अनेक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे कार्यालये बंद आहेत. आवश्यक उतारे मिळणे अशक्य आहे. तलाठी जागेवर सापडत नाहीत, बाहेर पडायला परवानगी नाही व उतारे दाखले मिळविण्यासाठी पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आॅनलाइन उपलब्ध आहेत मग शेतकºयांकडून कागदपत्रांचा आग्रह कशासाठी? बँकांनी आॅनलाइन शहानिशा करून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सदर निवेदनात म्हटले आहे.बागाइत भागात १० ते २० लाख रुपये एकर जमिनीची किंमत असली तरी कर्ज मिळण्याची कमाल मर्यादा फक्त ५० हजारच आहे. जिराईती भागात तर फारच कमी कर्ज पुरवठा होतो. किरकोळ रकमेसाठी मोठे क्षेत्र अडकून पडते व एक लाख रु पयांसाठी पन्नास लाख रुपयाच्या जमिनीचा लिलाव होतो. शेतकºयांना किमान सरकारने निर्धारित केलेल्या सरकारी व्हॅल्युएशनप्रमाणे रेडीरेकनरच्या किमतीइतके तरी एकरी कर्ज देण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील लिड बँकेचे अध्यक्ष व जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.मालमत्तेच्या तुलनेत तुटपुंजे कर्जदेशातील उद्योगपतींचे ६८ हजार कोटींचे कर्ज केंद्र सरकारने राइट- आॅफ केले आहे. हे माफ केले नाही फक्त सध्या हिशेबातून बाजूला ठेवले आहे. त्याच धरतीवर शेतकºयांचे कर्जसुद्धा राइटआॅफ करु न तातडीने नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. शेतकºयाच्या तारण मालमत्तेच्या तुलनेत त्याला अतिशय तुटपुंजे कर्ज दिले जाते. त्यामुळे त्याला पुरेसा कर्जपुरवठा होत नाही.

टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरी