शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:25 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे महापालिकेला आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागला होता. यंदा पालिकेने धरणातून वाढीव ४०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे महापालिकेला आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागला होता. यंदा पालिकेने धरणातून वाढीव ४०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे. महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. यापुढे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणाच्या पाणी आरक्षणासंदर्भात जलसंपदा विभागाकडे वाढीव पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे. यंदा गंगापूर धरणातून ४३०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू याप्रमाणे एकूण ४६०० दलघफू पाण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी पाणी आरक्षण निश्चित करण्यावरूनही महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विरुद्ध शासन असा सामनाही रंगला होता. सन २०१६ मध्ये समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आवर्तनावरून वादाचा प्रसंग आला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. यंदाही महापालिकेने त्याच मागणीवर ठाम राहत नोंदणी केली आहे. यंदा गंगापूर धरणात ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गंगापूरमधून वाढीव पाणी आरक्षणाच्या मागणीबाबत जलसंपदा खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दारणातील पाणी आरक्षणाचा प्रश्नमहापालिकेसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केले जात असले तरी आजवर केवळ ३०० दलघफूच्या आसपासच पाणी उचल करू शकले आहे. ज्यावेळी चेहेडी बंधाºयाला आवर्तन असते त्याचवेळी पाणी उचल करता येते. त्यामुळे दारणातील पाणी आरक्षणाचा फारसा उपयोग महापालिकेला होत नाही. त्यासाठीच महापालिकेने दारणातील आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणात वाढवून देण्याची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. यंदाही महापालिकेला आरक्षित ४०० दलघफू पाण्यापैकी २७४.३२ दलघफू पाणीच उचलता आले आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा ३०० दलघफू पाण्याचीच मागणी केली आहे.