शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मुखेड फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:39 IST

नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.

मानोरी : नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास मात्र वाहनचालक तयार नसून मनमानी कारभारामुळे भरधाव वेगाने वाहने चालवत असून, तालुक्यातील मुखेड फाटा येथे येवल्याहून नाशिककडे आणि नाशिकहून येवल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अद्यापही गतिरोधक बसविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे.यात प्रामुख्याने मुखेडहून मुखेड फाटा येथे आल्यानंतर आणि पाटोदाच्या दिशेने मुखेड फाटा येथे आल्यानंतर येवला ते नाशिक आणि नाशिक ते येवला या दोन्ही बाजूंना गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. परिणामी गतिरोधक नसल्याने अनेक चारचाकी आणि दोनचाकी वाहने सर्रास वेगाने आपली वाहने चालवित असतात. त्यामुळे अनेकदा वाहने वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात घडले असून, अनेक वाहनचालक जखमी झाले असून, काहींच्या जिवावरदेखील अपघात ओढवला असून, या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ गतिरोधक बसवावे जेणे करून अपघातांच्या घटनेत कमीपणा येणार असल्याचे मुखेड फाटा येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा