शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना  लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:22 IST

राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या एक लाख कर्मचाºयांनी नवी पेन्शन योजना त्यागण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाºया जवळपास पाच हजारांहून अधिक कर्मचाºयांनी हातावर काळ्या फिती बांधून आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे बुधवारी (दि. १) जिल्ह्यातील विविध शासकीय शाळांसह आरोग्य, पाटबंधारे आदी विभागांतील कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभागी होत काळा दिवस पाळला.

नाशिक : राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या एक लाख कर्मचाºयांनी नवी पेन्शन योजना त्यागण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाºया जवळपास पाच हजारांहून अधिक कर्मचाºयांनी हातावर काळ्या फिती बांधून आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे बुधवारी (दि. १) जिल्ह्यातील विविध शासकीय शाळांसह आरोग्य, पाटबंधारे आदी विभागांतील कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभागी होत काळा दिवस पाळला.  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सचिन वडजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाचा निषेध करण्यासाठी नवीन पेन्शन योजनेतील सर्व कर्मचारी व अधिकाºयांनी १ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून काम केले. केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजना लागू करताना तशी अंमलबजावणी राज्य शासन करत नाही.  केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाºयांना ग्रॅच्युईटी आणि कुटुंब निवृत्तिवेतन मिळत नाही. विशेष म्हणजे, १० वर्षे सेवा बजावण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने १० वर्षांहून कमी सेवा बजावलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदतीची तरतूद केलेली आहे; मात्र सरकार कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत अद्यापही उदासीन असून, योजना राबविण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज वडजे यांनी व्यक्त केली. बेमुदत काम बंद आंदोलनाची तयारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी सर्व कर्मचारी करीत आहेत. त्यासाठी कर्मचारी हिवाळी अधिवेशनात सेवाग्राम ते नागपूर अशी पेन्शन दिंडी काढणार आहेत. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर मार्च महिन्यात सर्व शासकीय व निमशासकीय संघटनांना एकत्रित आणत बेमुदत काम बंद आंदोलनाची तयारी केली जाईल, असा इशाराही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिला आहे. शिक्षण विभागाचा वेतनश्रेणीवाढ निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. शिक्षक परिषदेने १ नोव्हेंबर रोजी या निर्णयाविरोधात काळा दिवस पाळून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.