शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

शिल्लक उन्हाळी कांद्याला एक हजार रूपये अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:29 IST

देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील ...

ठळक मुद्देउन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शिल्लक असलेल्या उन्हाळी कांद्याला शासनाने १००० रू प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील भऊर, वाजगाव, लोहोणेर, खामखेडा, सावकी, वासोळ, मेशी, दहिवड, उमराणे, वडाळे, कनकापूर, खर्डा आदी गावातील शेतकºयांनी दुष्काळ तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल हया अपेक्षेने मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवणुक करून ठेवला होता.मध्यंतरी ह्या उन्हाळी कांद्याचे दर काही काळासाठी दोन हजार रु पये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. शेतकºयांना कांदा विक्र ीतून आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी हा दर योग्य होता. परंतु त्यावेळी कांदा विकण्याची घाई करू नका, यापुढेही कांद्याचे दर वाढतील असे भाकीत वर्तविले गेले.सोशल मिडीयावर शेकडो स्वयंघोषित तज्ञांनी याबाबत उलटसुलट पोष्ट टाकून चुकीचे संदेश सर्वत्र पसरवले. यामुळे शेतकरी द्विधा मनिस्थतीत सापडून त्यांना अजून कांद्याचे दर वाढतील असा आशावाद बाळगत कांदा विक्रीसाठी योग्य परिस्थिती असतांना देखील कांद्याची विक्रि केली नाही. याबाबत अनेक शेतकर्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होते. परंतु पोळ कांदा बाजारात आल्यानंतर उन्हाळी कांद्याचे दर वाढण्याऐवजी ते सातत्याने कमी होत गेले. उन्हाळी कांद्याची मागणी घटल्यामुळे मातीमोल भावाने तो विकण्याची वेळ शेतकºयांवर आली. यामुळे हया शेतकºयांना कुटुंबातील सदस्यांची बोलणी ऐकावी लागून मनस्ताप भोगावा लागत आहे.अनेक ठिकाणी शेतकºयांचा उद्रेक बघावयास मिळाला. तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी पंढरीनाथ मेधने यांनी लिलावात उन्हाळी कांदा १०५ रुपये प्रतिक्विंटल पुकारल्यामुळे उद्विग्न होऊन विक्र ीसाठी आणलेला दोन ट्रॉली कांदा देवळा येथे पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गावर ओतून देत शासनापर्यंत शेतकºयांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केला.चौकट... पीक पाहणी सदोष पद्धतीने होत असल्यामुळे वरीष्ठ कार्यालयाकडे पीक लागवडीची व उत्पादनाची चुकीची आकडेवारी पाठवली जाते. काही अपवाद वगळता ग्रामीण स्तरावर काम करणारे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी न करता मागील वर्षाच्या कागदपत्रांचा आधार घेऊन पीक पाहणीची माहिती तयार करतात व वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवून देतात.ह्या आलेल्या माहीतीच्या आधारे शासन आयात निर्यात धोरणासंबंधी निर्णय घेते. त्याचा शेतकºयांना भुर्दंड सोसावा लागतो अशी तक्र ार कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.चालू वर्षी दुष्काळामुळे उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. तयार कांद्याच्या रोपांना देखील मागणी नाही. यामुळे हा कांदा रोपे तयार करण्यासाठी केलेला खर्च देखील वाया गेला आहे. उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.