शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

दुशिंगपूर पाझर तलावात उड्डाणपुल उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 5:40 PM

सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पाझर तलावाच्या माध्यमातून समृध्दी महामार्ग प्रस्तावित आहे. यातील केवळ १०० मीटर नदीच्या प्रवाहाची जागा सोडून उर्वरित ठिकाणी भरावा टाकून रस्ता बणविण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. मात्र, त्यातून पाझर तलावाच्या साठवण क्षमता कमी होऊन तलावाचे अस्तित्त्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अगोदरच दुष्काळी असणाऱ्या भागातील शेतकºयांचे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे. त्यामुळे सबंधित विभागाने संपूर्ण बंधाºयातून १ किलोमीटरचा उड्डाणपूल उभारावा, अन्यथा महामार्गाचे काम होवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. या कामासाठी समृद्धी महामार्गाच्या अधिकाºयांनी पाटबंधारे विभागाची परवानगीही घेतली नसल्याचा आरोप दुशिंगपूर ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. सदर कामच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप निवेदनात घेतला आहे. यासंदर्भात तहसीलदार नितीन गवळी, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिष्ठमंडळाने निवेदन देत वस्तुूस्थितीची जाणीव करून दिली. शिष्टमंडळाने दुशिंगपूरचे उपसरपंच कानिफनाथ घोटेकर, भास्कर कहांडळ, कानिफनाथ काळे, डॉ. विजय शिंदे यांच्यासह शेतकºयांचा समावेश होता. समृद्धी महामार्ग बंधा-याच्या माध्यमातूनच जात असल्याने येथे उड्डाणपुल न बांधल्यास पाणी साठा कमी होणार आहे. शिवाय बंधा-याच्या बॅकवॉटर परिसरातील रहिवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तहसीलदार गवळी यांनी समृद्धीचे काम करणा-या ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना बोलावून याबाबत समज दिली. दरम्यान दुशिंपूर तलावातून उड्डाणपूल न झाल्यास समृद्धी महामार्गाचे काम होवूच देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई