शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आरक्षणासह आर्थिक विकास महामंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:57 IST

राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता मुस्लीम तसेच धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे़ बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आता बदलत्या काळानुसार आरक्षणाची नितांत आवश्यकता असून,

नाशिक : राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता मुस्लीम तसेच धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे़ बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आता बदलत्या काळानुसार आरक्षणाची नितांत आवश्यकता असून, तत्पूर्वी युवती व महिलांची सुरक्षितता तसेच तरुणांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या महाचर्चेतून रविवारी (दि़२३) समोर आली़ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्र्यंबकरोडवरील अभ्यंकर सभागृहात ‘ब्राह्मण समाजास आरक्षण हवे की नको’ या विषयावर महाचर्चा घेण्यात आली़ या महाचर्चेनंतर सहा ठराव पारीत करण्यात आले असून, पूर्ततेसाठी दबावगट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत़पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ब्राह्मण समाजाने प्रांत व शाखाभेद विसरून एकमेकांमध्ये रोटी-बेटीचा व्यवहार करणे आवश्यक असल्याचे सांगितले़ तसेच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरले असून, जोपर्यंत समाजाच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकीत मतदान न करण्याची तसेच दबावगट तयार करण्याची सूचना मांडली़ सरकारने मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू केले असून, आरक्षणाच्या मागणीपूर्वीच निर्माण झालेल्या नोकऱ्यांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित करून उद्योगाकडे वळण्याचे आवाहन निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले़ तर देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सरस्वतीला लक्ष्मीची जोड आवश्यक असून, यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले़गुजरातमधून ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा समोर आला असून ही काळाची गरज आहे़ शिक्षण वा नोकरीमध्ये आरक्षण नाही तसेच विद्यार्थी अभ्यास करून जास्त टक्के पाडतात, मात्र त्यांना प्रवेश मिळत नाही़ समाजाला आरक्षण आवश्यक असले तरी त्यापूर्वी समाजातील युवकांच्या प्रगतीसाठी सर्वप्रथम आर्थिक विकास महामंडळ तसेच महिला व युवतींची सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश गोखले होते़ व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह उदयकुमार मुंगी, नगरसेवक दीपाली कुलकर्णी व अ‍ॅड़ श्यामला दीक्षित, अ‍ॅड. भानुदास शौचे, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, माधव भणगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी तर सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले.मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणारे ठरावदेशातील विविध जाती-जमातींच्या आरक्षणास ब्राह्मण समाजाचा विरोध नाही़ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून योग्य पाठबळ, शासकीय योजना व विशेष सवलती ब्राह्मण समाजास मिळणे आवश्यक असून त्यासाठी समाज एकत्र आला आहे़ब्राह्मण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची तातडीने स्थापना करावी़ब्राह्मण समाजाकरिता सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक सवलती योजना जाहीर करून निधी देण्यात यावा़देशातील महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करावी़पुरोहित वर्ग, वेद पाठशाळा व आर्थिक दुर्बल घटकांच्या मानधनासाठी योजना आखून अंमलबजावणी करण्यात यावी़

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार