शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भावड घाट रस्त्याच्या विस्तारीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:26 IST

भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : संबंधित विभागाचे दुर्लक्ष; अवजड वाहनांची संख्या वाढली

देवळा : भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते माळवाडी दरम्यान कापशी, भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर, गुंजाळनगर, देवळा व माळवाडी आदी गावे असून, अनेक शाळा रस्त्यालगत आहेत. भावड घाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट गतीने येतात. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच समोरून येणाऱ्या व ओव्हरटेक करताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात घडतात. त्यातच या रस्त्याची रु ंदी कमी असल्याने वाहनांना ओव्हरटेक करणे धोकादायक ठरते. दुचाकीस्वारांसाठी तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून, सर्वाधिक अपघात दुचाकींचे झाले आहेत. या रस्त्यावर वर्षभरापूर्वी गुंजाळनगर येथील कुणाल गांगुर्डे व भऊर येथील रोशन पवार या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता.विंचूर-प्रकाशा मार्गाचे विस्तारीकरण करून भावड घाट ते माळवाडीपर्यंत दुभाजक टाकल्यास वाहनांना शिस्त लागून अपघातांना आळा बसेल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने या मार्गावर दुभाजक टाकण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही.- सचिन आहेर, ग्राहक पंचायत सदस्य, देवळाभावड घाटापासून देवळ्याकडे असलेल्या तीव्र उताराचा फायदा घेण्यासाठी वाहन न्यूट्रल करून बंद करत डिझेल वाचवण्याची काही बेफिकीर वाहनचालकांची प्रवृत्ती अपघातांना आमंत्रण देणारी ठरते. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करीत वेगाने येणाºया वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्याची आवश्यकता आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर घाटातून येणाºया वाहनांची गती कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची व रस्त्याचे विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.- चंद्रकांत भदाणे, शेतकरी, कापशी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात