शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भावड घाट रस्त्याच्या विस्तारीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:26 IST

भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : संबंधित विभागाचे दुर्लक्ष; अवजड वाहनांची संख्या वाढली

देवळा : भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते माळवाडी दरम्यान कापशी, भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर, गुंजाळनगर, देवळा व माळवाडी आदी गावे असून, अनेक शाळा रस्त्यालगत आहेत. भावड घाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट गतीने येतात. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच समोरून येणाऱ्या व ओव्हरटेक करताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात घडतात. त्यातच या रस्त्याची रु ंदी कमी असल्याने वाहनांना ओव्हरटेक करणे धोकादायक ठरते. दुचाकीस्वारांसाठी तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून, सर्वाधिक अपघात दुचाकींचे झाले आहेत. या रस्त्यावर वर्षभरापूर्वी गुंजाळनगर येथील कुणाल गांगुर्डे व भऊर येथील रोशन पवार या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता.विंचूर-प्रकाशा मार्गाचे विस्तारीकरण करून भावड घाट ते माळवाडीपर्यंत दुभाजक टाकल्यास वाहनांना शिस्त लागून अपघातांना आळा बसेल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने या मार्गावर दुभाजक टाकण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही.- सचिन आहेर, ग्राहक पंचायत सदस्य, देवळाभावड घाटापासून देवळ्याकडे असलेल्या तीव्र उताराचा फायदा घेण्यासाठी वाहन न्यूट्रल करून बंद करत डिझेल वाचवण्याची काही बेफिकीर वाहनचालकांची प्रवृत्ती अपघातांना आमंत्रण देणारी ठरते. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करीत वेगाने येणाºया वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्याची आवश्यकता आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर घाटातून येणाºया वाहनांची गती कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची व रस्त्याचे विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.- चंद्रकांत भदाणे, शेतकरी, कापशी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात