शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

भावड घाट रस्त्याच्या विस्तारीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:26 IST

भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : संबंधित विभागाचे दुर्लक्ष; अवजड वाहनांची संख्या वाढली

देवळा : भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते माळवाडी दरम्यान कापशी, भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर, गुंजाळनगर, देवळा व माळवाडी आदी गावे असून, अनेक शाळा रस्त्यालगत आहेत. भावड घाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट गतीने येतात. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच समोरून येणाऱ्या व ओव्हरटेक करताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात घडतात. त्यातच या रस्त्याची रु ंदी कमी असल्याने वाहनांना ओव्हरटेक करणे धोकादायक ठरते. दुचाकीस्वारांसाठी तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून, सर्वाधिक अपघात दुचाकींचे झाले आहेत. या रस्त्यावर वर्षभरापूर्वी गुंजाळनगर येथील कुणाल गांगुर्डे व भऊर येथील रोशन पवार या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता.विंचूर-प्रकाशा मार्गाचे विस्तारीकरण करून भावड घाट ते माळवाडीपर्यंत दुभाजक टाकल्यास वाहनांना शिस्त लागून अपघातांना आळा बसेल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने या मार्गावर दुभाजक टाकण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही.- सचिन आहेर, ग्राहक पंचायत सदस्य, देवळाभावड घाटापासून देवळ्याकडे असलेल्या तीव्र उताराचा फायदा घेण्यासाठी वाहन न्यूट्रल करून बंद करत डिझेल वाचवण्याची काही बेफिकीर वाहनचालकांची प्रवृत्ती अपघातांना आमंत्रण देणारी ठरते. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करीत वेगाने येणाºया वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्याची आवश्यकता आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर घाटातून येणाºया वाहनांची गती कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची व रस्त्याचे विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.- चंद्रकांत भदाणे, शेतकरी, कापशी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात