शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:10 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल केल्याप्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले असले तरी नाशिक शहरात मात्र शांततेने निषेध नोंदविण्यात आला. भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये प्रतिसाद मिळाला नाही.

नाशिक : अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल केल्याप्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले असले तरी नाशिक शहरात मात्र शांततेने निषेध नोंदविण्यात आला. भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये प्रतिसाद मिळाला नाही. एका प्रकरणात न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणून संशयितांना तत्काळ अटक करण्यात येऊ नये, असा निकाल दिला आहे. या निर्णयाचा देशभरातील दलित संघटनांनी निषेध नोंदवित यासंदर्भात केंद्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे दलितांना मिळणारे संरक्षण कमी होऊन त्यांच्यावरील अत्याचाराच्या प्रकारात वाढ होण्याची भीती दलित संघटनांनी व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध दर्शवित देशभरातील अनुसूचित जाती व जमाती संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार शहरात भीम आर्मी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांना निवेदन देण्यात आले. संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आसार यांची मुक्तता करण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, कोरेगाव भीमा प्रकरणातील दलितांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर शशी उन्हवणे, कविता पवार, केतन पगारे, सुजित जाधव, अमोल शार्दुल, पुष्पराज गायकवाड, महेश साळवे, शालिनी शेळके आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद