शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By admin | Updated: August 30, 2015 22:40 IST

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

खामखेडा : देवळा तालुक्यात चालू वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खामखेडा परिसरात जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी खामखेडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.खामखेडा परिसरात आतापर्यंत अगदी अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिना संपला तरी शेतीउपयोगी पाऊस नाही. नदी-नाले, विहिरी, कूपनलिका, छोटे-मोठे बंधारे कोरडे पडले आहेत. श्रावण महिन्यामध्ये गिरणा दुथडी भरून वाहत असे. नदी पार करण्यास कोणीही हिंमत करत नसे. श्रावण महिना अर्धा होत आला तरी अजूनही नदीला पाणी नाही. नदीचे पात्र कोरडे ठणठणीत असून, भकास दिसत आहे. आता गिरणा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा असणाऱ्या गावांना टंचाई जाणवू लागली आहे. मुबलक पाणी असणाऱ्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदी-नाले कोरडे असल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे जनावरांना खायला चारा नाही व शिवारात विहिरींना पाणी नसल्याने चाऱ्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने, त्यामुळे आपले किमती पशुधन सांभाळणे मोठे अवघड झाले आहे. दररोज हवामानात बदल झाला की बळीराजाच्या नजरा अकाशाकडे जातात. पावसासाठी दररोज देवाला साकडे घातले जाते. ‘धोंड्या धोंड्या पाणी दे’चा गजर गावामध्ये रात्रीच्या वेळेस ऐकावयास मिळत आहे. जुन्या वयोवृद्ध माणसांच्या अनुभवातून १९७२ च्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ भयानक आहे. १९७२ च्या दुष्काळात पिण्यासाठी पाणी होते, फक्त खाण्यासाठी अन्न नव्हते. यावेळेस खायला अन्न आहे परंतु जनावरांसाठी चारा व पिण्यासाठी पाण्याचा दुष्काळ आहे. तेव्हा शासनाने तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी खामखेडा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)