शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण् याची काग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 17:55 IST

सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या. तसेच माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत असल्याने तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.जवळपास अर्धा पावसाळा झाला तरी सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात पडलेला नाही. पश्चिम पट्ट्यात थोडाफार पाऊस झाला. मात्र पूर्व भाग कोरडा असल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या, दुबार पेरण्याही वाया गेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भापेक्षाही भयानक स्थिती तालुक्याच्या पूर्व भागाची असून माणसांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचीही भ्रांत झाली आहे. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच महसूल यंत्रणेमार्फत जागेवर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावे, योग्य आणेवारी वर्गीकरण करावे, जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. बँका, सोसायटी, पतसंस्था, फायनान्स तसेच महावितरणची जाचक वसुली थांबवावी. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका उपाध्यक्ष गोपाळ गायकर, कैलास दातीर, गणेश जाधव, अर्जुन घोरपडे, दामु शेळके, दिनेश इंगळे, बाजीराव दळवी, छबु थोरात, रावसाहेब थोरात, नारायण पगार आदींच्या स्वाक्षºया आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरी