नाशिक : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे सुभाोभिकरण करण्याबरोबरच मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्येही जयंती साजरी करण्यात यावी, असे निवेदन छावा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांची ३२५ वी जयंती येत्या १४ मे रोजी होत आहे. सदर जयंती साजरी करण्यापूर्वी शहरातील संभाजीराजे यांचा पुतळा सुशोभित करण्यात यावा तसेच शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शंभूराजांनी वयाच्या ३४ व्या वर्षापयंर्त आपल्या पराक्रमाने १२५ लढाया जिंकल्या. कोणताही तह न करता त्यांनी अवघ्या नऊ वर्षांत या लढाया जिंकल्या आहेत. अशा या राजाची जयंती मनपाच्या विभागीय कार्यालयांमध्येदेखील साजरी करण्यात यावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर अविनाश सोनवणे, किरण डोखे, करण गायकर, शरद पाटील, नितीन दातीर, नितीन पाटील, ज्ञानेश्वर थोरात, अविनाश गायकर, राकेश कोर, सचिन जाधव, विनय उगले आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. कॅप्शन- मनपा आयुक्तांना निवेदन देताना छावा संघटनेचे करण गायकर, अविनाश गायकर, अविनाश सोनवणे, किरण डोखे, नितीन दातीर, शरद पाटील, विजय वाहुले, बाळा खांडे, शिवा तेलंग, गिरीश अहिरे, देवा वारुंगसे, विनय उगले, सुभाष गायकर आदि.
संभाजी जयंती साजरी करण्याची मागणी
By admin | Updated: May 7, 2014 22:01 IST